खरीप हंगामात केवळ एक रुपयात पीक विमा योजनेत सहभागी व्हा…

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांचे आवाहन..

⚡ओरोस ता १९-: नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतक-यांना आर्थिक आधार मिळावा याकरीता येणा-या प्रधानमंत्री पीक योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी शेतक-यांना पेरणी न होणे तसेच पुर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे. खरीप हंगामामध्ये कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात हा भात, नाचणी या पिकांकरीता पीक विमा उतरविता येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page