⚡कणकवली ता.३०-: गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना न्याय मिळवा याकरिता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गिरणी कामगार चळवळी यांच्यावतीने रविवार 2 जून रोजी सकाळी 10 वा. मुंबईत करीरोड येथील भारत माता सिनेमागृहासमोर प्रभू रामचंद्रांची अखंड रामरक्षा व हनुमान चालिशी नामस्मरण पठाण करून अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे.
गिरणी कामगार व त्यांचे वारस आणि मराठी माणसांचे जीवन राज्य सरकारने आस्थर केले आहे. मराठी माणसांवरचा अन्याय दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याला राजकीय पक्षांचे नेतेच जबाबदार आहेत. राज्य सरकारला गिरणी कामगार व त्यांच्या वासरांची ताकद दाखवून देण्यासाठी गिरणी कामगार चळवळी कार्यरत आहे. गिरणी कामगार व वारसांच्या 42 वर्षांचा संघर्षाला न्याय लवकरच मिळावा म्हणूनच प्रभू रामचंद्राचे अखंड रामरक्षा व हनुमान चालिशी नामस्मरण पठाण करण्यासाठी मुंबईतील गिरणी कामगार व त्यांचा वारसांनी ठरवले आहे. या अनोख्या आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन चळवळीतर्फे करण्यात आले आहे. या आंदोलनाविषयी अधिक माहितीसाठी (9833439242,7021950238)या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन गिरणी कामगार चळवळीने केले आहे.
