*नाणार बद्दल फक्त खा. सुरेश प्रभू नीच बोलावे -शिवसेना प्रवक्ते जयेंद्र परुळेकर*
*💫सावंतवाडी दि.१२-:* नाणार रिफायनरी प्रश्नी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चार पानी पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्या अनुषंगाने भाजपचे नेते बोलत आहेत . तर रिफायनरी प्रकल्पाला नाणार म्हणू नका असे सांगत मुख्यमंत्र्यांनी नाणार होणार नाही म्हणत नाणार ला पुर्णविराम दिला आहे. आजही येथील गावांचा या प्रकल्पाला विरोध असून, विरोध मावळला असे खोटे पसरवायचे काम भाजप करत आहे. यासंबंधी सुरेश प्रभूंनी बोलावं असं आवाहन शिवसेना प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केले.
