परिस्थिती सुधारा अन्यथा टोकाची भूमिका:सिद्धेश तेडोलकर यांचा इशारा..
⚡सावंतवाडी ता.०७-: मळगाव मध्ये गेली 5 ते 6 दिवस जिओचे नेटवर्क नसल्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आताच्या डिजिटल युगात अनेक ग्राहकांनी आपले नो जिओमध्ये पोर्टेबल करून घेतले. परंतु गेले 5-6 दिवस जिओची रेंज नसल्याने ऑनलाईन पेमेंट, व्यापारी वर्ग, शालेय विद्यार्थ्यांची ऑनलाईन अभ्यास, तसेच संपर्क याबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशीच परिस्थिती जर पुढील दिवसात राहिली तर टोकाची भूमिका घ्यावी लागेल यास सर्वस्वी जबाबदार संबंधित जिओ कंपनीचे अधिकारी राहतील असा इशारा राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेडोलकर यांनी दिला आहे.
