अंदाजे दोन लाखाचे नुकसान
*💫बांदा दि.१०-:* तांबोळी असनिये मुख्य मार्गालगत बिरामाळी येथील काजू बागेला आज दुपारी साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली असून, या आगीत मिलिंद देसाई आणि रावजीराव देसाई यांची २०० काजू कलमे जळून खाक झाली आहेत. वीज वाहिनीमध्ये स्पार्किंग होऊन काजू बागेला ही आग लागल्याचे स्पष्ट झाले असून, सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
