ग्रामपंचायतीचा उपक्रम;जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतला पुढाकार
⚡सावंतवाडी ता.२७-: ग्रामपंचायतीच्या वतीने मळगाव घाटात आज सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून, यासाठी गावचे सरपंच स्नेहल जामदार आणि ग्रामस्थ तुलसीदास नाईक यांनी पुढाकार घेतला होता. मळगाव येथील श्री देव भूतनाथ जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.
यावेळी केतन नार्वेकर, संतोष नार्वेकर, उदय जामदार, विश्वनाथ गोसावि निलेश चव्हाण, सिद्धेश फेंद्रे, राजाराम शिरोडकर, प्रसाद नार्वेकर, समीर परब, अथर्व धुरी , निलेश नाटेकर, आर्यन लोके, प्रथमेश खडपकर, मनिष नाटेकर, उदय फेंद्रे, राजा नाटेकर, शेखर राऊळ, प्रसाद लुमाजी तर उदय जमदार यांनी टेम्पो उपलब्ध करून दिला या कचऱ्याची एका विशिष्ट जागेत जाऊन विल्हेवाट करण्यात येणार आहे.
