कणकवली १७ जुलै (प्रतिनिधी)-वैश्य समाजातील गुणवंत विद्यार्थी / विदयार्थीनींचा गुणगौरव सोहळा रविवार २४ जुलै २०२२ रोजी दुपारी २.३० वाजता आयोजित केलेला आहे.
हा सोहळा श्री श्री श्री वामनाश्रम स्वामीजींच्या उपस्थितीत होणार आहे . या निमित्त जयंत मणेरकर आणि सौ वैशाली मणेकर यांचे दहावी /बारावी / पदवी नंतर पुढे काय ? यासाठी व्यवसाय आणि नोकरीबाबत मार्ग दर्शन आयोजित केलेले आहे आणि ते सर्वांसाठी अत्यावश्यक आहे . तरी सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष वैश्य समाज तालुका कणकवली जि सिंधुदुर्ग आणि चातुर्मास सोहळा समिती यांनी केले आहे.
