मालवण आगारातून मुंबई, रत्नागिरी साठी जाणाऱ्या बस फेऱ्या सुरू…

मालवण (प्रतिनिधी) मालवण आगारातून सकाळी ८ वाजता मालवण- मुंबई अशी बसफेरी तर मुंबईवरून पहाटे ४ वाजता मुंबई – मालवण अशी बसफेरी सुरू करण्यात आली आहे. तर मालवण आगारातून सकाळी साडे आठ वाजता सुटणारी मालवण – रत्नागिरी ही पूर्वी प्रमाणे पूर्ववत करण्यात आली असून ती सकाळी ६ वाजता सोडण्यात येणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मालवण आगारात ७ चालक कंत्राटी स्वरूपात घेण्यात आले आहेत, अशी माहिती आगारप्रमुख सचेतन बोवलेकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page