भाजप प्रवक्ते संजू परब यांची टीका
*⚡सावंतवाडी ता.१९-:* दोडामार्ग मध्ये भाजपला निर्विवाद मिळालेला विजय हा आमदार दिपक केसरकर यांच्या खोट्या आश्वासनाना चोख प्रत्युत्तर असल्याची टीका सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. दोडामार्ग मध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यानी यावेळी ग्लोबल महाराष्ट्रशी बोलताना केली आहे.
