तहसीलदार राजराम म्हेत्रे उपस्थितीत झाली चर्चा
*⚡सावंतवाडी ता.०७-:* माजगाव मेटवाडी येथील गेली कित्येक वर्ष सावंतवाडी नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेवर अवलंबून होती. ही नळपाणी योजना बंद करण्यात आल्याने यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी या भागासाठी स्वतंत्र विहीर बांधून नळपाणी योजना सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना तहसीलदार म्हात्रे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत. परंतु, सद्या त्या भागाला भासत असलेल्या पाणी टंचाईचा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.
