मुख्यमंत्र्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष;मनसेच्या गुरुदास गवंडे यांनी वेधले तहसीलदारांचे लक्ष
*⚡सावंतवाडी ता.२३-:* महाराष्ट्रात असणाऱ्या सर्व परप्रांतीय लोकांचे नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले असताना देखील सावंतवाडी तालुक्यात त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे. ही अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे केली आहे.
