Headlines

कदाचित मातोश्रीने बाजूला केल्याने केंद्राने तौक्ते चक्रीवादळात केलेली मदत माहीत नसेल

खासदार विनायक राउताना भाजपा नेते आशिष शेलार यांची कोपरखळी

*💫कुडाळ दि.२३-:* तोक्ते चक्रीवादळात महाराष्ट्राला केंद्राकडून कोणतीही मदत जाहीर झाले नसल्याची टीका करणारे खासदार विनायक राऊत यांना कदाचित मातोश्रीने आता बाजूला केले असावे. त्यामुळे केंद्राने काय मदत केली. याची माहिती त्यांना नसावी असा चिमटा आशिष शेलार यांनी खासदार विनायक राऊत यांना काढला आहे. या चक्रीवादळावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वारंवार संपर्कात होते. व वेळोवेळी ते माहिती घेऊन मदतीसाठी संपर्कात होते. असा खुलासा आशिष शेलार यांनी केला आहे.

You cannot copy content of this page