सुरेश गावडे : २५ मे पर्यंत कालव्याला पाणी न आल्यास प्रखर आंदोलन_
*💫बांदा दि.१२-:* तिलारी कालव्याचे काम सुरु होऊन चाळीस वर्षांचा कालावधी लोटला तरीही प्रकल्पबाधित गावांना पाणी मिळणे दिवास्वप्नच राहिले आहे. कालव्याचे काम कासवगतीने सुरु असून हा प्रकल्प केवळ कागदावरच आहे. संबंधित विभागाचे अधिकारी केवळ आश्वासने देऊन वेळ मारुन नेण्याचे काम करतात. कालव्याचा कारभार पाहता केवळ ठेकेदारांकडून मिळणार्या टक्केवारीसाठी चालला असल्याचा गंभीर आरोप रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. २५ मे पर्यंत कालव्यातून रोणापाल गावापर्यंत पाणी न आल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
