आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करा-:भास्कर काजरेकर…

⚡मालवण ता.२५-:
शेतकऱ्यांनी शेती करताना आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती केल्यास निश्चितच त्यातून चांगले उत्पन्न निर्माण होऊ शकते. यासाठी कृषी विभागाच्या विविध योजना आणि तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. प्रशासनाचे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान हा सुंदर उपक्रम असून अशा उपक्रमांचा लाभ प्रत्येक गावागावातील शेतकऱ्यांना झाला पाहिजे, असे मत किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर यांनी राठिवडे येथे बोलताना केले.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत राठीवडे येथे नाचणी व वरई पिकावरील आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्र किर्लोसचे शास्त्रज्ञ भास्कर काजरेकर, राठीवडे सरपंच दिव्या धुरी, पोईप मंडळ कृषी अधिकारी दशरथ सावंत, ओवळीये सरपंच रंजना पडवळ, पोईपचे उपकृषि अधिकारी श्रीपाद चव्हाण, राठीवडे उपसरपंच स्वप्निल पुजारे, असगणी उपसरपंच देवेंद्र पुजारे, पं. स. विस्तार अधिकारी श्री. रणसिंग, ग्रा. प.सदस्य बाळा धुरी, काजल धुरी, यशवंत राऊत, सहाय्यक कृषी अधिकारी अमृता राणे, सहाय्यक कृषी अधिकारी स्नेहल जिकमडे, कृषी सेवक नितेश पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी विनोद रावले, पोलीस पाटील संदेश धुरी तसेच वरई व नाचणी पीक प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आलेले शेतकरी व इतर शेतकरी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी नाचणी व वरई लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन व पीक व्यवस्थापन आणि कृषी विभागाच्या विविध योजना याविषयी मार्गदर्शन केले. हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरला असून भविष्यातही अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन असगणीच्या सहाय्यक कृषि अधिकारी स्नेहल जिकमडे यांनी केले.

You cannot copy content of this page