“त्या” बॅनरचे खरे सूत्रधार राजन तेलींच…

संजू परब यांचा गंभीर आरोप: यापुढे एक जरी असा बॅनर दिसला तर तुम्हाला निवडणूक सोडून कणकवलीला जावे लागेल..

सावंतवाडी ता.०६-: दिपक केसरकर यांच्या विरोधात लावण्यात आलेले बॅनरचे खरे सुत्रदार राजन तेली आहेत असा आरोप शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी आज येथे केले.दरम्यान यापुढे जर या मतदारसंघात पुन्हा असे बॅनर दिसल्यास निवडणूक सोडून पुन्हा कणकवलीला जावे लागेल असा इशाराही श्री परब यांनी यावेळी दिला.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

म्हणाले, समोर येऊन लढण्याची हिंमत तेलींमध्ये नाही. त्यामुळे ते अंधारात लहान मुलांसारखे अशी बालीशकृत्ये करत आहेत. दरोडेखोरासारखे रात्रीचे बॅनर लावत आहेत‌.‌ हिंमत असेल तर त्यांनी जाहीर सभा घेऊन आरोप करावेत. त्याला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. राणेंच्या विरोधात लावलेला हा शेवटचा बॅनर आहेत. यापुढे एकजरी बॅनर लावला तर तेलींना निवडणूक सोडून कणकवलीत जावे लागेल असा इशारा शिवसेना जिल्हा संघटक संजू परब यांनी दिला. आम्हाला बाहेरची माणस नको. सावंतवाडीतील लोकप्रतिनिधी सक्षम आहेत. आम्ही तक्रार करत नाही, औकात काढतो. त्यामुळे कुणाला शोधायची गरज नाही.‌ बॅनर कोणी लावले आम्हाला माहीत आहे. याची माहीती जाहीरपणे प्रशासनाला देत आहे‌. त्यामुळे यापुढे त्यांनी अशी हिंमत करू नये. आमच्या बॅनरमधील मजकूर असा असेल की ते पुन्हा बॅनर लावायची हिंमत करणार नाही. याप्रसंगी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, युवासेनेचे सुरज परब, हेमंत बांदेकर, क्लेटस फर्नांडिस आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page