भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांचा गंभीर आरोप
*💫सावंतवाडी दि.१२-:* बांदा – दोडामार्ग रस्त्याचे काम पालकमंत्री उदय सामंत यांच्या भावाला मिळत नसल्याने, या रस्त्याचे काम अडवून ठेवले असल्याचा आरोप जिल्हा भाजप प्रवक्ते संजू परब यांनी आज बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना जाब विचारताना केला आहे. यावेळी खड्डे बूजवण्यासाठी मंजूर झालेले ५५ लाख हे पालकमंत्री, आमदार यांनी वाटून घेतले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. आमदार केसरकर यांना तीनवेळा निवडून देऊन येथील जनता फसली असल्याचा गंभीर आरोप संजू परब यांनी यावेळी केला आहे.
