Headlines

श्री रामसीतेच्या मूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठापना संपन्न…

⚡वेंगुर्ला ता.२३-: येथील प्रसिद्ध श्री रामेश्वर मंदिरात नूतन बांधण्यात आलेल्या श्री राम मंदिरात शुक्रवारी श्री रामसीतेच्या मूर्तीची पुनःप्राणप्रतिष्ठापना तसेच कलशारोहण करण्यात आले.

Read More

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची शनिवारी बैठक…

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. ही बैठक शनिवार दि. २४ मे रोजी सकाळी ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. या बैठकीला…

Read More

कणकवलीत २६ मे रोजी रक्तदान शिबीर…

कणकवली : कणकवलीतील बाळगोपाळ हनुमान मित्र मंडळाच्यावतीने सोमवार २६ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत बाळगोपाळ हनुमान मंदिर व धर्मराज महाराज समाधी स्थान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शनी जयंतीनिमित्त हे शिबिर आयोजित केले असून जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरासंबंधी अधिक माहितीसाठी अनिल अणावकर, योगेश…

Read More

मुसळधार पाऊस सुरू ; कणकवली आचरा मार्ग पुलाचे काम सुरू असल्याने बंद  

कणकवली : तालुक्यातील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. कणकवली ते आचरा आणि आचरा ते कणकवली येथे येण्यासाठी नागरिकांना चार किलोमीटर चा प्रवास करून कलमठ कुंभारवाडी मार्गे जावे लागणार आहे. यावर्षी पावसाळ्यापूर्वी वरवडे येथील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. गेले सहा महिने…

Read More

चौके परिसरातील बीएसएनएल सेवा ठप्प…

तात्काळ उपाययोजना करून सेवा सुरळीत करावी : शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजा गावडे.. मालवण दि प्रतिनिधी :चौके परिसरातील साळेल बीएसएनएल टॉवर माध्यमातून परिसरात दिली जाणारी सेवा तीन दिवस ठप्प आहे. मोबाईल सेवेसाठी बीएसएनएल सेवेवर अवलंबुन असणाऱ्या लगतच्या गावातील ग्राहक व ग्रामस्थ यांना याचा फटका बसला आहे. तरी संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना करून सेवा सुरळीत करावी अशी लक्षवेधी…

Read More

मालवण तालुका अंधारात राहिल्याने संताप्त ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात दिली धडक…!

⚡मालवण ता.२३-:मालवण तालुका पहिल्याच पावसात ३० तासापेक्षा जास्त काळ अंधारात राहिल्याने संतप्त ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील महावितरणच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना घेराओ घालत जाब विचारला. वीज ग्राहकांना नुकसान भरपाई मिळायला हवी अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली. यावर अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई बाबत शासन निर्णयाची माहिती दिली. तसेच दिवसभरात वीज पुरवठा सुरळीत होईल, असे स्पष्ट करण्यात आले….

Read More

आचरा उबाठा शिवसेनेतर्फे उद्या वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा…

⚡मालवण ता.२२-:अवकाळी पावसामुळे मालवण तालुक्यात वीज महावितरण कंपनीच्या कारभाराचा पोलखोल झाला असून आचरा दशक्रोशीत गेले तीन दिवस सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या आचरा विभागाच्या वतीने आचरे येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर उद्या २३ मे रोजी सकाळी साडे दहा वाजता धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उबाठा शिवसेना…

Read More

पिंगुळीत १ जून पासून चित्रकथी लोककला कार्यशाळा…

कुडाळ : ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी, पिंगुळी यांच्या वतीने पिंगुळी येथे महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणाऱ्या चित्रकथी स्टोरीटेलिंग आर्ट कार्यशाळेचे आयोजन १ जून २०२५ रोजी करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सकाळी १० वाजता ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.चित्रकथी ही ठाकर आदिवासी समाजाची पारंपरिक कला असून, तिच्यात चित्रे, कथा…

Read More

पहिल्याच पावसात महावितरण विभाग नापास…

कलमठच्या ग्रामस्थांनी घातला महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव:सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थ आक्रमक.. कणकवली : तालुक्यातील कलमठ येथील विज समस्यांबाबत आक्रमक झालेल्या सरपंच संदीप मेस्त्री यांच्यासह ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. कनिष्ठ अभियंता श्री. बोंगाळे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या संतप्त ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरले. अखेर उपकार्यकारी अभियंता विलास बगडे यांनी आठवडाभरात प्रलंबित कामे पूर्ण…

Read More

पावसाळा कालावधीत प्रशासनाच्या सर्व विभागांनी सतर्क राहावे…

प्रांताधिकारी जगदीश कातकर:आपत्ती व्यवस्थापनचा संपर्क क्रमांक जाहीर ; आपत्ती समयी नागरिकांनी संपर्क साधण्याचे केले आवाहन.. ⚡कणकवली ता.२२-: आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कणकवली तालुक्यातील प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सूचना कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिल्या. कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा नियंत्रण कक्ष १० मे पासून सुरू करण्यात आला असून, कणकवली तालुक्यात कोणत्याही ठिकाणी पावसाळ्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीची…

Read More
You cannot copy content of this page