कोरोना काळात बंद असलेल्या एस. टी. बस फेऱ्या चालू करा

शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व पदाधिकाऱ्यांनी केली मागणी *⚡मालवण दि.२९-:* मालवण आगारातून सुरू असलेल्या ग्रामीण तसेच कुडाळ कणकवली शहरात सुरू असलेल्या व कोरोना काळात बंद असलेल्या एस टी बस फेऱ्या तातडीने चालू कराव्यात अशी मागणी शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली. मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने मालवण आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे…

Read More

अतिवृष्टी बाधीत मागासवर्गीय घर दुरुस्तीला मिळणार ३५ हजार

समाजकल्याण सभेत निर्णय *⚡ओरोस दि.२९-:* जिल्हा परिषदेच्या २० टक्के सेस निधी मधून मागासवर्गीयांच्या घर दुरुस्ती साठी ३५ हजार रुपये पर्यंत अनुदान देण्याची योजना आहे. तरी अतिवृष्टीमध्ये घराची पडझड झालेल्या लाभार्थींचे घर दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा. तसेच घरकुल दुरुस्तीसाठी असलेली अंदाजपत्रकाची अट रद्द करा. असे आदेश सभापती अंकुश जाधव यांनी समाजकल्याण समिती सभेत दिले. जिल्हा…

Read More

खारेपाटण केंद्र शाळा नं.१ ची “यशोगाथा केस स्टडी ” साठी राज्यस्तरावर निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव जि. प. प्राथमिक शाळा *⚡कणकवली दि.२९-:* महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा ),औरंगाबाद यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ठतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या काही शाळांच्या “केस स्टडीज चे ” संकलन नुकतेच करण्यात आले असून यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून एकमेव अशा कणकवली तालुक्यातील जि प पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेची राज्यस्तरावर…

Read More

मळगाव येथे रेल्वेची धडक बसून अज्ञात इसमाचा मृत्यू…?

*⚡सावंतवाडी दि.२९-:* मळगाव येथे रेल्वेची धडक बसल्यामुळे अज्ञाताचा इसमाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार आज दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडला. सावंतवाडी रेल्वे स्थानकाजवळ मळगाव येथे रेल्वे ट्रॅकवर छिन्नविच्छिन्न अवस्थेतएका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना व पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांसह पोलीस घटनास्थळावर दाखल…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १९१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.२९-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४४हजार २९२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार ५३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १९१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

नाटळ रामेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता केला दुरुस्त ​​

माजी जि.प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी घेतला पुढाकार *⚡​​​कणकवली दि२९-:* ​कणकवली तालुक्यातील नाटळ रामेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता पुरात वाहून गेला होता.​ ​पावसाचे प्रमाण कमी होताच पोकलॅन व डंपरच्या सहाय्याने माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत यांनी स्वखर्चाने रस्त्याच्या खचलेल्या भागात भराव घालण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे लवकरच हा मार्ग वाहतुकीस पावसाळ्याच्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात…

Read More

गणेश चतुर्थी काळात कार्यक्रमासाठी परवानगी न मिळाल्यास जनआंदोलन

प्रांताधिकारी यांची भेट घेत लोक कलाकारांसह प्रकाश पारकर यांचा इशारा *⚡कणकवली दि.२९-:* कोकणातील लोक कलाकारांवर कोविड – १९ प्रादुर्भाव कालावधीमध्ये मागील दोन वर्ष उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने कोणत्याही प्रकारची मदत केली नाही त्यामध्ये भजन ,कीर्तनकार ,दशावतार, मृदुंगमणी, गोंधळी ,शक्ती तुरा, नमन यासारखे सर्वच लोककलाकार कार्यक्रम बंद असल्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने शासनाकडून जास्तीत…

Read More

पत्रकार प्रसन्न गोंदावळे यांना कोकण विभाग पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान

संघाच्या वर्धापनदिनी शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या उपस्थितीत ठाणे येथे प्रदान 💫सावंतवाडी ता.२८-:* कोकण विभाग पत्रकार संघाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ग्लोबल महाराष्ट्र चॅनलचे पत्रकार प्रसन्न गोंदावळे यांना अनुसूचित जमाती आढावा कमिटीचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या उपस्थितीत ठाणे येथे प्रदान करण्यात आला. कोकण विभाग पत्रकार संघाचा ९ वा वर्धापन दिन व…

Read More

कळणे मायनिंगची ही तर धोक्याची सुरुवात

खाणीतील पाणी व चिखमय माती शेतीत व लोकवस्तीत दाखल *💫दोडामार्ग दि.२९सुमित दळवी-:* कळणे गावात सध्या मायनिंग मोठया प्रमाणात चालते याच मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आहे. त्यामुळे भूस्खलन होऊन तेथील काही भाग खाणीत कोसळला.परिणामी खाणीतील पाणी व चिखमय माती परिसरातील शेती व लोकवस्तीत आली आहे. रस्त्यावर पूर्णपणे चिखल आल्यामुळे वाहतूक करण्यास त्रासदायक ठरत आहे.कळणे…

Read More

पूरस्थितीत केलेल्या मदतीबद्दल कातकरी समाज भारावला…

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह प्रशासनाचे मानले आभार कणकवली 29 जुलै (प्रतिनिधी)- अतिवृष्टीमुळे कणकवली शहरातील निमेवाडी येथे गवळदेव जवळ झोपडी बांधून राहणाऱ्या 7 कातकरी कुटुंबातील सुमारे 22 कातकरी बांधवांचा पुरात त्यांचा संसारच वाहून गेला होता. या कातकरी बांधवांना  कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. याबद्दल पूरस्थिती केलेल्या मदतीबद्दल कातकरी समाजाने…

Read More
You cannot copy content of this page