Global Maharashtra Breaking News

माऊली मंदिर ते हुडावाडी मुख्य रस्त्याच्या साईड पट्टीचे काम केल्याबद्दल माऊली युवा प्रतिष्ठानने मानले आभार…

⚡सावंतवाडी ता.३०-: पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या व खाणकामासाठी प्रसिद्ध असलेल्या अश्या रेडी हुडा ते श्री देवी माऊली मंदिर या रेडीतील मुख्य रस्त्याला डांबरीकरण करते वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने साईडपट्टी केलीच नव्हती. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूची साईड पट्टी खूप खोल झाल्याने ती वाहतुकीस धोकादायक झाली होती व वाहतूक कोंडीच्या समस्येचा व अपघातांचा देखील सामना नागरिकांना करावा…

Read More

मालवणमध्ये सेवांगण येथे ९ फेब्रुवारीला मोफत आरोग्य तपासणी शिबीर…

⚡मालवण ता.३०-:अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबीराचे आयोजन दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९. ३० ते दुपारी २ या वेळेत एस. एम. जोशी संकुल सेवांगण, मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरा मध्ये हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब ऍलर्जी, अस्थमा, त्वचाविकार,…

Read More

बांद्यात २२ फेब्रुवारी रोजी शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.३०-: मराठी भाषा गौरवदिनाचे औचित्य साधून अंकुश रामचंद्र माजगांवकर व परिवार पुरस्कृत (कै.) परशुराम लाडू नाईक व (कै.) लक्ष्मीबाई परशुराम नाईक स्मरणार्थ शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन येथील नट वाचनालयात शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली आहे.पहिला गट इयत्ता पाचवी ते सातवी व…

Read More

संत राऊळ महाराज महाविद्यालयात १ फेब्रुवारीला राष्ट्रीय चर्चासत्र…

सामाजिक शास्त्र, इंग्रजी साहित्य आणि ग्रंथालय शास्त्र यांमधील नवे प्रवाह:देशभरातून तज्ज्ञ मार्गदर्शकांची उपस्थिती.. कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग, इंग्रजी विभाग, ग्रंथालय विभाग आणि ICSSR (WRC), Mumbai. यांच्या संयुक्तविद्यमाने ”सामाजिक शास्त्र, इंग्रजी साहित्य आणि ग्रंथालय शास्त्र यांमधील नवे प्रवाह” या विषयावर १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात देशभरातील…

Read More

संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये इन्स्पायर कॅम्पचे आयोजन…

अकरावी सायन्सच्या टॅलेंटेड विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी:नामवंत शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक यांची संवादात्मक सत्रे.. ⚡कुडाळ ता.२९-: संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळ व विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने ४ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी DST-INSPIRE CAMP संत राऊळ कॉलेज कुडाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरामध्ये…

Read More

हळवल रेल्वे उड्डाण पुलाचे काम मार्गी लागणार…

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी वेधले होते खा. नारायण राणे व पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे लक्ष :भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांची माहिती.. ⚡कणकवली ता.२९-: मागील अनेक वर्षे शहरानजीक असलेल्या हळवल रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न अखेर खासदार नारायण राणे व पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर हा निकाली लागलेला उड्डाणपुलाचा…

Read More

एलसीबी ची धडक कारवाई…

ओसरगाव बोर्डवेतील दोघांवर गुन्हा दाखल.. ⚡कणकवली ता.२९-: रिक्षा मधून वाहतूक होत असलेल्या गोवा बनावटीच्या ५३ हजार रुपयांच्या अवैध दारुसह दीड लाख रुपये किंमतीची श्री सीटर रिक्षा असा २ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल एलसीबी च्या पथकाने २९ जानेवारी रोजी जप्त करत ओसरगाव आणि बोर्डवे येथील दोन युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीष नामदेव…

Read More

पत्रकार प्रवीण मांजरेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

सावंतवाडी ताक्रिकेट सामन्याच्या दरम्यान मैदानावर क्षेत्ररक्षण करीत असताना हदयविकारचा झटका आल्यामुळे सावंतवाडीतील जेष्ठ पत्रकार तथा रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे निधन झाले.ही घटना आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ओरोस येथे घडली त्यांना अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले

Read More

तळवडे येथील श्री सिद्धिविनायक मंदिरचा ३२ वा वर्धापन दिन…

⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री सिद्धिविनायक मंदिर३२ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन १ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.यावेळी श्री गणेश जयंती मोठ्या थाटात साजरी केली जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे श्री सिद्धिविनायक मंदिराचा 32 वा वर्धापन दिन साजरा होणार आहे.यावेळी सकाळी 8 वाजता अभिषेक व होम हवन व धार्मिक विधी, दुपारी 1 वाजता आरती,…

Read More

कवितेतून निसर्गाची विविध रूपे लिहिणे गरजेचे-सिद्धार्थ तांबे…

⚡वेंगुर्ला ता.२९-: कविता लिहिणे, वाचणे म्हणजे सत्याच्या जवळ जाणे होय. आपल्या अवतीभवतीचे प्रश्न कवीतेतून मांडत असताना इथल्या निसर्गाची विविध रूपे कवितेतून लिहिणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी सिद्धार्थ तांबे यांनी केले. फोटोओळी – मुख्याध्यापक सुनिल जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

Read More
You cannot copy content of this page