चिंदर माळरानावर आंबा काजू कलमबागा जळून खाक….
लाखो रुपयांची हानी *ð«मालवण दि.०६-:* चिंदर सडेवाडी येथील माळरानावर दुपारच्या सुमारास आग लागली होती. सोसाट्याचा वारा असल्याने ही आग चिंदर सडेवाडी माळरानावर पसरली. या आगीने रौद्ररुप धारण केल्याने सर्वत्र हाहाकार माजला होता. या आगीत मोठया प्रमाणात शेतकऱ्यांच्या आंबा काजूकलम बागा भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.आग लागल्याचे समजताच चिंदर गावातील ग्रामस्थांनी धाव…
