Global Maharashtra Breaking News

खत पुरवठा लवकरच

खा राऊत यांचे रूपेश राऊळ यांना आश्वासन *💫सावंतवाडी दि.११-:* खरीप हंगामा करीता शेतकऱ्यांना लागणारे खत लवकरात लवकर कृषी सेवा केंद्रांना पुरविण्यात येईल असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांना दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या. संस्थेने संपूर्णा आणि समर्थ या…

Read More

मच्छीमारीला जावू नये..नागरिकांनी सतर्क रहावे

तहसीलदार अजय पाटणे यांचे आवाहन *💫मालवण दि.११-:* बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने येत्या दोन दिवसात जिल्ह्यात जोरदार वारे व अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असल्याने मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीकरिता जाऊ नये, तसेच नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे. दि. ११, १२ व १३ जून रोजी जिल्ह्यात तुरळक…

Read More

माझ्या विधानाला गुंडगिरी म्हणणाऱ्यांनी आपल्या पक्षाची कोणत्या भाषेतून झाली हे पहावे

भाजप गटनेते रणजीत देसाई यांचा सेना गटनेते नागेंद्र परब यांना टोला *💫कुडाळ दि.११-:* शिवसेनेची स्थापना ही मुळातच गुंडगिरीच्या भाषेवर झाली असताना माझ्या विधानाला गुंडगिरीची भाषा सांगून सहानुभूती मिळविण्याचा तसेच पक्षातील आपल्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आपली पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न नागेंद्र परब यांनी करू नये, असा टोला जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते रणजित देसाई यांनी शिवसेनेचे गटनेते…

Read More

मळेवाड रुग्णालयासाठी स्वतंत्र रुग्णवाहीका

पालकमंत्र्यांनी घेतली दखल ः राजन मुळीक यांच्या मागणीला यश *💫सावंतवाडी दि.११-:* रुग्णवाहिकांवरून जिल्ह्यात जरी राजकारण, स्टंटबाजी होत असली तरी पालकमंत्री उदय सामंत यांनी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला खनिकर्म विभागातून रुग्णवाहिका देणार असल्याचा दिलेला शब्द पूर्ण केला. त्यामुळे कोरोना काळात आता रुग्णांची होणारी परवड थांबणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी दिली….

Read More

ग्रामस्थांच्या योगदानामुळेच विकासकामे शक्य : मंदार नाईक

*💫बांदा दि.११-:* गावातील विकासकामे ग्रामस्थांच्या योगदानाशिवाय होत नसतात. प्रत्येक ग्रामस्थ आपल्यापरीने योगदान देत असतो पण तो त्याची प्रसिद्धी करत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक हा प्रसिद्धीचा भुकेलेला नसल्यामुळे तो प्रसिद्धीसाठी स्टेटमेंट कधीही देत नाही. आरोस सरपंचांना कुठच्या प्रकारचे योगदान अपेक्षित आहे? तसेच केवळ विरोधासाठी विरोध न करता सत्यता पडताळा, असा प्रतिटोला मनसे विभागप्रमुख मंदार नाईक…

Read More

कणकवलीतील व्यापाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करावी लागणार

सोमवारपासून अंमलबजावणी;व्यापाऱ्यांनी न.पं.ला सहकार्य करण्याचे आवाहन *💫कणकवली दि.११-:* कणकवली शहरातील सर्व व्यापाऱ्यांना सोमवार पासून कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली असून बाजारपेठेत ३ ठिकाणी नगरपंचायतकडून व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करिता टेबल लावण्यात येतील तेथे सर्व व्यापाऱ्यांनी आपली आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी. किंवा स्वत: आरटीपीसीआर टेस्ट करायची असेल तर उपजिल्हा रुग्णालयात करून घ्यावी. असे आवाहन नगराध्यक्ष समीर…

Read More

दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपची सामाजिक बांधिलकी

कणकवली नगरपंचायत विलगीकरण कक्षाला गादी,उशी,चादरी दिली भेट *💫कणकवली दि.११-:* कणकवली येथील दिल दोस्ती दुनियादारी ग्रुपच्याने सामाजिक बांधिलकीचे उदाहरण दिले असून कणकवली न.प.च्या 100 बेडच्या कोविड 19 संस्थात्मक विलगीकरण कक्षाला कोरोना रुग्णांसाठी गादी,उशी,चादरी भेट दिली आहे. कणकवली न.प.च्या पुढाकाराने भगवती मंगल कार्यालय येथे 100 बेडचे कोविड 19 संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे .या विलगीकरण…

Read More

तोक्ते चक्रीवादळातील शेतकरी, मच्छिमारांना तुटपुंजी मदत

मच्छीमारांही 5 लाखाचे कर्ज शून्य टक्के व्याज दराने द्यावे:परशुराम उपरकर *💫कणकवली दि.११-:* चक्रीवादळाचा बोटींचे व जाळ्यांचे मोठ्या प्रमाणात मच्छीमारांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे मच्छीमारांना देखील ५ लाखापर्यंत कर्ज शून्य टक्के व्याजदराने कर्ज द्यावे.अशी मागणी मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी केली असून शेतकऱ्यांच्या नारळ, पोफळी,आंबा,काजू बागांचे कोट्यावधीची हानी होऊन अत्यंत तुटपुंजी मदत सरकारने जाहीर करत तोंडाला…

Read More

आषाढी वारीसाठी 10 पालख्यांनाच परवानगी

करोनाच्या धोक्यामुळे यंदाही पायी वारी रद्द;अजित पवारांची मोठी घोषणा पुणे : महाराष्ट्रात मोठ्या श्रद्धेने साजरा होणारा आषाढी वारी सोहळा यंदाही करोनाच्या संकटात असणार आहे. कारण, यंदा फक्त दहा मानाच्या पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते पुण्यात वारीसंदर्भात आयोजित बैठकीमध्ये बोलत होते. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी…

Read More

कोळंब न्हीवेवाडी प्रतिबंधित क्षेत्र

१७ पर्यंत आदेश लागू; सरपंच प्रतिमा भोजणे यांची माहिती *💫मालवण दि.११-:* कोळंब न्हिवेवाडीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १० जून पासून ते १७ जून रात्री ८ पर्यंत पूर्ण न्हिवेवाडी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती सरपंच प्रतिमा भोजने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या कालावधीत वाडीतील कोणीही व्यक्ती बाहेर फिरणार…

Read More
You cannot copy content of this page