Global Maharashtra Breaking News

….तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घेऊ नयेत

आरक्षण प्रश्न मिटवा अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष आंदोलन करेल *💫कणकवली दि.०६-:* ओबीसी समाज व इतर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा व तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक घेऊ नयेत अन्यथा भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवाजी जंगले व जिल्हा प्रभारी राजेंद्र माने यांनी दिला आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय समाज…

Read More

नारायण राणेंना तातडीने दिल्लीत बोलाविले

जे पी नड्डा यांच्या कार्यालयातून आला फोन;राणेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता-; सूत्रांची माहिती *💫सिंधुदुर्ग दि.०५ प्रसन्न गोंदावळे-:* माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांना उद्या तातडीने दिल्लीत बोलवण्यात आले आहे. भाजपचे जे.पी. नड्डा यांच्या कार्यालयातून याबाबत त्यांना फोन आला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून, कदाचित नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळण्याचे जवळपास निश्चित झाले…

Read More

कणकवली रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. विद्याधर तायशेटे

11 जुलै रोजी पदग्रहण सोहळा होणार;विविध उपक्रम राबविणार *💫कणकवली दि.०५-:* रोटरी क्लब ऑफ कणकवलीच्या २०२१-२२ या वर्षासाठी कणकवली रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. विद्याधर तायशेटे यांची निवड करण्यात आली. डॉ. तायशेटे व नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवार, ११ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वा. हुंबरट येथील ‘हॉटेल सावली’ येथे आयोजित करण्यात आला आहे. रोटरीतर्फे पुढील वर्षात आरोग्यविषयक,…

Read More

साहसी आणि संवेदनशील निर्णय घेत दिला न्याय

सिंधुदुर्ग सरपंच संघटनेने मानले जि. प. अध्यक्षांचे आभार *💫कणकवली दि.०५-:* सिंधुदुर्ग जि. प. अध्यक्षा संजना सावंत नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने घेतलेल्या या साहसी आणि संवेदनशील निर्णयांबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच संघटनेमार्फत त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांचेही सरपंच संघटनेने स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच संघटनेचे पदाधिकारी संतोष राणे, तुकाराम…

Read More

इंधन दरवाढीमुळे काँग्रेसचे केंद्रसरकार विरोधात महाआंदोलन

तालुका पातळीवर काढणार सायकल यात्रा; जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांची माहिती *💫सावंतवाडी दि.०५-:* देशात इंधन आणि महागाई वाढत असल्याने कॉंग्रेसने केंद्र सरकारच्या विरोधात महा आंदोलन पुकारले असून, याबाबतची माहिती जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी दिली आहे. यावेळी हे महा आंदोलन शुक्रवार दिनांक ९ जुलै पासून सुरु करण्यात येणार असून, महिलांकडून जिल्हा मुख्यालय येथे आंदोलन करण्यात येणार आहे….

Read More

मालवणात विद्युतभारीत तारेचा स्पर्श झाल्याने गायीचा मृत्यू

शेतकऱ्याचे हजारोचे नुकसान मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील दांडी झालझुल वाडी येथे असणाऱ्या विजेच्या खांबातून प्रवाहित झालेल्या विजेचा स्पर्श झाल्याने सखाराम अनंत सातार्डेकर रा. वायरी यांच्या मालकीच्या दुभत्या गायीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दांडी झालझुल वाडी येथे असणाऱ्या विजेच्या खांबाला असलेल्या वीज वाहिन्या या खंडित झाल्याने विद्युत खांबाला…

Read More

कोंकण रेल्वे विद्युतीकरण तारेच्या चोरीमागे कंपनीतील एका कामगाराचाच हात

चोरी केलेला माल परस्पर विकल्याचा संशय;चौकशी करण्याची राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाताडे यांची मागणी *💫कुडाळ दि.०५-:* कोकण रेल्वेचे विद्युतीकरण करणाऱ्या ठेकदार कंपनीतील एका कामगारांनी विद्युतीकरणासाठी आलेली तार व इतर सामान चोरी करून परस्पर विकले आहे. असा आरोप जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाताडे यांनी केला असून, सबंधित व्यक्ती आणि कंपनीची पूर्ण चौकशी करून…

Read More

जांभवडेतील पवार बंधूंची अशीही दुनियादारी

शासनाच्या मदतीची वाट न पाहता जामदा नदीवर बांधला साकव *💫वैभववाडी दि.०५-:* विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात आजही काही वाडी-वस्त्यांवर मूलभूत पायाभूत सुविधाच पोहोचल्या नाहीत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणा-या जांभवडे आणि कोळंब या गावांमधून वाहणाऱ्या जामदा नदीवर जांभवडे येथील पवार बंधूनी ६० फूट लांबीचा लाकडी साकव घातला आहे. त्यांनी आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून साकव पूर्णत्वास नेला…

Read More

*बहुजन मुक्ती पार्टीचे वीजबिल माफिसाठी उद्या कंदील भेट आंदोलन

*बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष लाडू जाधव यांची माहिती *💫सावंतवाडी दि.०५-:* महाराष्ट्रात लॉक डाऊन मुळे जनता संकटात सापडलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारने थकित वीज बिल माफ करून नवीन बिल आकारणी योग्य रित्या करण्यात यावी यासाठी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीकडून उद्या दिनांक ६ जुलै २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एकाच…

Read More

भंडारी आरक्षणासाठी समाजाचा भांडुप येथे मुकमोर्चा

मालवण दि प्रतिनिधी उठ ओबीसी उठ, आणि वळव तुझी वज्रमूठ… ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा प्रकारचे फलक हाती घेऊन राज्य शासनाकडून रद्द झालेले ओबीसी आरक्षण पुन्हा मिळावे या मागणीसाठी भंडारी समाज महासंघातर्फे भंडारी समाज बांधवांनी आज गाढव नाका भांडुप पश्चिम मुंबई येथे मूकमोर्चा काढण्यात आला. शासनाने ओबीसी समाजाला पुन्हा आरक्षण न दिल्यास यापुढे व्यापक…

Read More
You cannot copy content of this page