Global Maharashtra Breaking News

झारापमधील कॅन्सरग्रस्त व्यक्तीला दहा हजाराची मदत

कै दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचा मदतीचा हात *⚡सावंतवाडी ता.२७-:* कै. दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट , मुंबई यांच्या माध्यमातून झाराप येथील लक्ष्मीकांत सामंत या ४८ वर्षीय कॅन्सर ग्रस्त रुग्णाला औषधोपचारासाठी १० हजार रूपयांची आर्थिक मदत केली असून, त्याचा धनादेश त्यांच्या पुतण्याकडे डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला आहे.

Read More

बैलगाडी शर्यती व बैलांची झुंज कार्यक्रमाला परवानगी मिळावी

आ.नितेश राणे यांची पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे मागणी *⚡कणकवली ता.२७-:* कोविड १९ या महामारीच्या कालावधीमध्ये शासनाने सर्व प्रकारच्या सार्वजनिक व करमणूकीच्या कार्यक्रमांवर बंधने आणलेली होती . त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गेले दीड वर्षे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत . आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने दूर करण्यात येत आहेत . वर…

Read More

कोळोशी-आयनल-असलदे गावात तलाठी द्या

ग्रामस्थांची प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे मागणी *⚡कणकवली ता.२७-:* कणकवली तालुक्यातील कोळोशी आयनल असलदे गावात तलाठी नसल्याने गावातील बहुतेक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गावांना लवकरात लवकर तलाठी मिळावा अन्यथा कोतवालांला तलाठी करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार यांची भेट देऊन दिले….

Read More

१७ दिवसांच्या सेवेनंतर वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील मानाच्या गणरायाला निरोप

*⚡वेंगुर्ले ता.२७-:* वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील मानाच्या १७ दिवसांच्या गणरायाला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून भक्तिमय वातावरणात रविवारी रात्री निरोप दिला. गणेशोत्सव असो किंवा दिवाळी प्रत्येक वेळी समाजाच्या संरक्षणासाठी सेवा बजावणाऱ्या पोलिसांना स्वतःच्या घरी सण साजरे करण्याचा अवधी फार कमी मिळतो. पोलिसांनाही आपल्या घरच्या उत्सवाप्रमाणे गणेशोत्सवात सहभागी होता यावे यासाठी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली….

Read More

राज्यावर सुरू असलेली संकटांची मालिका आता थांबू दे

पालकमंत्री उदय सामंत यांनी रिक्षा संघटनेच्या गणेशाचे घेतले दर्शन *⚡कणकवली ता.२७-:* सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कणकवली रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणेशाचे दर्शन घेतले आणि आरती केली. यावेळी ‘राज्यावर सुरू असलेली संकटांची मालिका आता थांबू दे’, असे साकडे कणकवलीच्या राजासमोर नाम. उदय सामंत…

Read More

कोविड नियमांचे पालन करून जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यास परवानगी देणार

पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय;आमदार वैभव नाईक यांची माहिती *⚡ओरोस ता.२७-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यासंदर्भात पालकमंत्री उदय सामंत,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे,मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी सुरज नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक संपन्न झाली. कोविड नियमांचे पालन करून जिल्ह्यातील वॉटरस्पोर्ट सुरू करण्यास परवानगी देण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले….

Read More

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय घ्या पण प्रथम पायाभूत सुविधा निर्माण करा

विमानतळाचे खरे श्रेय केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचेच:राजन तेली *⚡कणकवली ता.२७-:* चिपी विमानतळाचे श्रेय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेच आहे. त्यामुळे चिपी विमानतळाचा पाया रचणारे नाम.नारायण राणे हे मंत्री व्हावेत व त्यांच्याच मंत्री पदाच्या काळात विमानतळाचे उद्घाटन व्हावे हे नियतीनेच ठरविले होते.त्यामुळे शिवसेनेने विमानतळाच्या उद्घाटनाचे श्रेय घ्यावे,पण पायाभूत सुविधांचे काय? याचं उत्तर पालकमंत्री व आमदार ,खासदारांनी…

Read More

आजगाव बीएसएनएल टॉवर चे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते होणार उद्घाटन

फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये- सरपंच सुप्रिया वाडकर .. *⚡सावंतवाडी ता.२७-:* येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये आजगाव येथे होत असलेला बीएसएनएलचा टॉवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल आणि सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते त्याचे विधीवत उद्घाटन होईल. अशी माहिती आजगाव सरपंच सुप्रिया वाडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. आजगाव येथे बीएसएनएल टॉवर कार्यान्वित व्हावा…

Read More

भारतबंदला जिल्हा काँगेसचा पाठिंबा

केंद्र सरकारचा केला निषेध *⚡सावंतवाडी ता.२७-:* भारतातील शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या २७ सप्टेंबरच्या भारत बंदला जिल्हा काँग्रेस कडून जाहीर पाठिंबा देत. केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे.यावेळी केंद्र सरकारने केलेले तिन्ही काळे कृषी कायदे मागे घ्यावेत. तसेच शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देणारा कायदा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, जिल्हाध्यक्ष…

Read More

नरसोबा मित्रमंडळाच्या १७ दिवसाच्या गणरायाला भक्तीमय वातावरणात निरोप

*⚡सावंतवाडी ता.२६-:* सावंतवाडी जुना बाझार येथील नरसोबा गणेशोत्सव मित्र मंडळाच्या १७ दिवसाच्या गणरायाला आज भक्तीमय वातावरणात निरोप देण्यात आला आहे. यावेळी ढोल ताशाच्या गजरात भक्तीमय वातावरणात आणि कोरोना नियमांचे पालन करत मोती तलावात गणरायाचे विसर्जन करण्यात आले आहे.

Read More
You cannot copy content of this page