Global Maharashtra Breaking News

दिवाळीत प्रदूषण नको

हिंदू जनजागृतीचे निवेदन सिंधुदुर्गनगरी ता २९ फटाक्यांमुळे वायूप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषण होते. फटाक्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात , तसेच अनेकांना गंभीर शारीरिक दुखापती झाल्या आहेत. फटाक्यांच्या वेष्टनांवरील हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांमुळे देवतांचा सर्रास अवमान होतो. हे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या होऊन त्या जागोजागी पडलेल्या आढळतात. त्यामुळे देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा…

Read More

माधुरी – महेंद्र प्रतिष्ठानच्यावतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

*⚡कणकवली ता.२९-:* स्वातंत्र्योत्तर भारत काल , आज आणि उद्या ‘ ह्या विषयावर माधुरी – महेंद्र प्रतिष्ठानने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे . रू . ५,००० / – रू .४,००० / – , रु .३,००० / – रु .२,००० / – व रू .१,००० / – अशी गुणानुक्रमे पारितोषिके ठेवली आहेत. निबंध स्पर्धेत भाग घेणाऱ्या…

Read More

मालवणात अवकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन

*⚡मालवण ता.२९-:* रोटरी क्लब मालवण तर्फे सर्वांसाठी विनामूल्य अवकाश दर्शन कार्यक्रमाचे आयोजन दि. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६. ३० ते रात्री ८ वाजता मालवण धुरीवाडा येथील टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडवर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी मंदार माईणकर हे दुर्बिणीद्वारे अवकाशातील चंद्र, ग्रह, नक्षत्र आदींचे दर्शन घडविणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी…

Read More

शतकीपार लक्ष्मीबाई केळकर यांचे निधन

*⚡मालवण ता.२९-:* श्रीमती लक्ष्मीबाई दत्तात्रय केळकर (वय १०१) राहणा-या आचरा पारवाडी यांचे गुरुवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. आचरे पारवाडी येथील एकत्र नांदणा-या केळकर कुंटुंबीयांच्या त्या कुटुंब प्रमुख होत्या. मृत्यूसमयी त्यांचे वय १०१ वर्षे होते. आचरे येथील ऊपाध्याय पुरुषोत्तम उर्फ बंडू,चंद्रकांत केळकर यांच्या त्या माताश्री होत. त्यांचे पश्चात सहा मुलगे एक मुलगी, सुना , नातवंडे, पंतवडे…

Read More

काळसे गावात गुरांना लसीकरण ; पाच गायी मृत झाल्याच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची खबरदारी.

शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे डॉ. अनिल तेली यांचे आवाहन. *⚡मालवण ता.२९-:* गेल्या दोन दिवसांत काळसे गावात पाच गायी अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पशुसंवर्धन विभागाने याची तातडीने दखल घेत काळसे गावातील गुरांना ” एच. एस.” ही लस देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आकस्मिक मृत झालेल्या गायीचा कोणत्या रोगामुळे मृत्यू झाला याचे ठोस कारण अद्याप…

Read More

पेन्शन योजनेबाबत ग्रामसेवकांनी छेडले आंदोलन

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* वेंगुर्ला राष्ट्रीय पेन्शन योजना (एन.पी.एस.) रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत आज (दि.२९) महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्यावतीने वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा वेंगुर्ल्याचे अध्यक्ष गणेश बागायतकर, तालुका उपाध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, कृषी विस्तार अधिकारी संदेश परब, पालकरवाडी ग्रामसेवक व्ही….

Read More

नाटळ मल्हार नदीवरून आठ दिवसात एसटी वाहतूक सुरू होणार

माजी जि.प.अध्यक्ष गोट्या सावंत यांना कार्यकारी अभियंता यांचे आश्वासन *⚡कणकवली ता.२९-:* नाटळ येथील मल्हार पूल पावसाळ्यामध्ये अचानक कोसळल्यामुळे लोकांच्या वाहतूकीचा मोठया प्रमाणात प्रश्न निर्माण झाला होता.मात्र आता नदीतील पाणी कमी झाल्याने मल्हार नदीवर नवीन पुलाचे काम होईपर्यत तात्पुरत्या स्वरूपात एस टी वाहतुकीसाठी रस्त्याचे काम सुरु करण्यात येणार असून येत्या आठवड्याभरात हे काम पूर्ण करून एस…

Read More

१ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस सदस्य नोंदणीचा शुभारंभ

*⚡सावंतवाडी ता.२९-:* १ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी दिली. सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही गावडे यांनी केले. गावडे म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने संपूर्ण देशात काँग्रेस सदस्य नोंदणी कार्यक्रमाच्या सूचना दिलेल्या आहेत. या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे…

Read More

मायनिंगचा बुडीत महसूल व वाळूच्या अनधिकृत कामांना अधिकाऱ्यांची साथ

परशुराम उपरकर यांचा आरोप;15 दिवसांत कारवाई न झाल्यास प्रांत कार्यालयावर मोर्चा *⚡कणकवली ता.२९-:* वाळू आणि सिलिका मायनिंगमध्ये शासनाचा असलेला महसूल बुडविण्याचं काम शासनाचे अधिकारीच करीत आहेत.कासार्डे गावातील सिलिका मायनिंगबाबत गेले वर्षभर तक्रारी सुरू आहेत. पियाळी येथेही याच तक्रारी आहेत. मायनिंगचा सुमारे दहा ते बारा कोटींचा दंड अजून शासनाला प्राप्त झालेला नाही.मायनिंगबाबत सादर केलेल्या अहवाल तहसीलदारांनी…

Read More

अन्यायाची चीड अशीच कृतीतून उमटू द्या, कायदेशीर सहकार्य सदैव राहील – ॲड.संग्राम देसाई

महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या कार्यालयाचा सिंधुदुर्गनगरीत शानदार उद्घाटन सोहळा *⚡ओरोस ता २९-:* अन्यायाविरोधात पेटून उठणाऱ्या समितीच्या कार्यकर्त्यांचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. भविष्यात महाराष्ट्र लोकाधिकार समिती संघटनेच्या कामाला भक्कम पाठिंबा आणि कायदेशीर सहकार्य समाज म्हणून उभे करू, असे महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल उपाध्यक्ष ॲड. संग्राम देसाई यांनी सांगितले. ते सिंधुदुर्गनगरी येथील महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या कार्यालयाच्या उदघाटन…

Read More
You cannot copy content of this page