Global Maharashtra Breaking News

पाच दिवसांच्या बाप्पांचे जल्लोषात विसर्जन

⚡बांदा ता.०४-: ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर’ या अशा जयघोषात न्हावेली, पाडलोस, आरोस परिसरातील पाच दिवसांच्या बाप्पांचे जल्लोषात विसर्जन करण्यात आले. पावसाच्या विश्रांतीमुळे लहानांपासून थोरांपर्यंतचा उत्स्फूर्त सहभाग आणि बाप्पांचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात बाप्पांना निरोप देण्यात आला.

Read More

आंबोलीतील अवैद्य दारुधंदे बंद करण्यासंदर्भात आंबोली, चौकुळ सरपंचाची पोलीसांशी चर्चा

⚡आंबोली ता.०४-: आंबोली, चौकुळ मधील अवैद्य दारु धंदे बंद करणेबाबत आंबोली व चौकुळ सरपंचानी आंबोली पोलीसांशी आज चर्चा केली.यावेळी आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर, चौकुळ सरपंच सुरेश उर्फ बाबु शेटवे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष वैभव राऊळ, माजी सरपंच गुलाबराव गावडे, संतोष पालेकर, मंगलबाबु व ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने बाहेरील गाड्या मोठ्या प्रमाणावर दोन्ही गावात…

Read More

सावंतवाडी शहर व तालुक्यातील पाच दिवसीय बाप्पांचे थाटात विसर्जन

⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडी शहरातील पाच दिवसीय गणपतींचे आज येथील मोती तलावात थाटात विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषाने मोती तलाव परिसर दुमदुमून गेला होता.तसेच तालुक्यातील पाच दिवसीय गणपती बाप्पांचे उशिरापर्यंत विसर्जन चालू होते. सावंतवाडी शहरातील पाच दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शहरात विसर्जनावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला…

Read More

गौरी पूजन भक्तिमय वातावरणात

वेंगुर्लेत परंपरेनुसार गौरी पूजन ⚡वेंगुर्ला ता.०४-: वेंगुर्ला शहरासह तालुक्यात काही घरोघरी प्रत्येकाच्या परंपरेनुसार आज रविवारी उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गौरी पूजन करण्यात आले.

Read More

पर्यावरण २५ हजार नवीन उद्योजक आणणार

७५ हजार रोजगार निर्माण होणार;उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती ⚡वेंगुर्ला ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या सहा महिन्यात पर्यावरण पूरक उद्योग आणण्याचा माझा मानस आहे. देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून २५ हजार नवीन उद्योजक आणि त्यांच्या माध्यमातून ७५ हजारहून लोकांना रोजगार मिळण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला येथे केली. दरम्यान आडाळी,…

Read More

सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रफुल्ल जाधव यांना जाहीर

⚡कणकवली ता.०४-: सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार यावर्षी श्री महालक्ष्मी विद्यामंदिर कोकिसरे, वैभववाडी येथील शिक्षक प्रफुल्ल जाधव यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम 5 हजार, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. सतीश पवार, सचिव शुभांगी पवार यांनी ही माहिती दिली. गतवर्षीपासून…

Read More

सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक वसंत जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन

⚡सावंतवाडी ता.०४- : पोलिस खात्यात हवालदार, जमादार,पोलीस उपनिरीक्षक, पोलीस निरक्षक या पदावर सिंधुदुर्ग, रायगड, आणि रत्नागिरी या ठिकाणी सेवा बजावून २००९ साली निवृत्त झालेले वसंत बाबू जाधव (वय ६८) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने कुडाळ येथे खासगी रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कर्करोगासारख्या असाध्य आजाराने ग्रासले. वयाच्या ६८व्या वर्षी त्यांनी शनिवारी…

Read More

बळीराम कोकरे यांचे निधन

नापणे धनगरवाडा येथील होते जेष्ठ नागरिक वैभववाडी प्रतिनिधीनापणे धनगरवाडा येथील जेष्ठ नागरिक बळीराम धुळाजी कोकरे वय 85 यांचे वृद्धापकाळाने राहाते घरी निधन झाले.हरकुळ खुर्दचे आरोग्य सेवक विजय कोकरे यांचे ते वडिल होत.पश्चात विवाहीत एक मुलगा,एक मुलगी,सुना जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

Read More

सिद्धेश कुलकर्णी यांच्याकडून तिवरे खालचीवाडी शाळेस लॅपटॉप-ब्लूटूथ स्पिकर भेट

⚡कणकवली ता.०४-: सध्याचे युग हे विज्ञानाचे व तंत्रज्ञानाचे युग मानले जाते. मानवी शक्तीचा विकास करण्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करणे फार गरजेचे आहे. या उदात्त हेतूने मुंबईतील सिद्धेश कुलकर्णी यांनी तिवरे खालचीवाडी जि. प. पूर्ण प्रा. शाळेस लॅपटॉप व ब्लूटूथ स्पिकर भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपसली.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास आंबेलकर, विना वर्ल्डचे मयूर नेरुरकर, मुख्याध्यापक…

Read More

सिंधुदुर्गच्या खेळाडूंमधील टॅलेंटला वाव देणे गरजेचे

राजेश पवार;भारताचे डावखुरे फिरकी गोलंदाज राजेश पवार भजनात झाले दंग ⚡कणकवली ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे मात्र या गुणवत्तेला योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. सिंधुदुर्गातून यापूर्वी अनेक दर्जेदार क्रिकेटपटू तयार झाले आणि भविष्यातही गुणवंत क्रिकेटपटू तयार होण्यासाठी मूलभूत सुविधा आणि पाठबळाची गरज आहे, या दोन्ही गोष्टी मिळाल्या तर सिंधुदुर्गच्या क्रिकेटचे भवितव्य उज्वल…

Read More
You cannot copy content of this page