Headlines

Global Maharashtra Breaking News

सायबर फसवणुकीपासून सावध राहा; विद्यार्थ्यांना बांदा पोलिसांचे मार्गदर्शन…

⚡बांदा ता.२४-: “आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने सतर्क राहणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक टाळावे आणि वैयक्तिक तसेच बँक खात्याशी संबंधित माहिती कोणालाही देऊ नये. सायबर फसवणुकीचा बळी ठरल्यास तातडीने १९३० हेल्पलाइन किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा,” असे आवाहन बांदा पोलीस…

Read More

कणकवली नगरपंचायतीत ‘एकल महिला दिवस’ उत्साहात साजरा…

विधवा ऐवजी ‘एकल महिला’ संज्ञेचा सन्मानपूर्वक स्वीकार:महिलांच्या समस्या, योजना व स्वावलंबनावर सविस्तर चर्चा.. कणकवली : संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या २३ जून ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिना’निमित्त महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित राज्य एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने कणकवली नगरपंचायत येथे ‘एकल महिला दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. ‘विधवा’ या शब्दाऐवजी ‘एकल महिला’ ही सन्मानजनक संज्ञा वापरत शहरातील महिलांना निमंत्रित करण्यात…

Read More

मळेवाड पंचक्रोशीत हाय व्होल्टेजमुळे विद्युत उपकरणांचे नुकसान…

⚡सावंतवाडी ता.२४-: मळेवाड पंचक्रोशीतील नागरिकांना सध्या वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्यातील अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिसरात हाय व्होल्टेजचा त्रास वाढल्याने अनेक घरांमधील विद्युत उपकरण निकामी होत आहेत तसेच इतर विद्युत उपकरणांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहेत. याशिवाय विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या लागून वीज पुरवठा खंडित होत आहे.मात्र ह्या बाबत पावसाळ्याआधी या विद्युत…

Read More

कुडाळ न.प.चे कंत्राटी सल्लागार एक वर्ष पेमेंटविना…

कार्यमुक्त करण्याची कंत्राटी सल्लागारांची विनंती :काम असेल तरच बसा, नाहीतर सभागृहाबाहेर जाण्याचे त्यांना आदेश.. ⚡कुडाळ ता.२४-: कुडाळ नगर पंचायतचे कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेले सल्लागार नरसू बाबू रेडकर यांचे गेल्या वर्षभराचे पेमेंट नगर पंचायतीने दिलेच नसल्याची बाब आज झालेल्या कुडाळ नगर पंचायतच्या मासिक बैठकीत समोर आली. आपले पेमेंट वर्षभर मिळत नसल्याने मला थकीत पेमेंट देऊन कार्यमुक्त…

Read More

फोंडाघाटमध्ये मध्यरात्री भूकंपसदृश धक्के; चार घरांना तडे…

विद्यानगर-बेलदारवाडी परिसरातील घरांचे नुकसान:सरपंच संजना आग्रे यांची घटनास्थळी पाहणी.. ⚡कणकवली ता.२४-: तालुक्यातील फोंडाघाट येथील विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात २३ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ११:३० ते ११:४५ वाजण्याच्या दरम्यान भूकंपसदृश धक्के जाणवल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या धक्क्यांमुळे परिसरातील चार घरांचे नुकसान झाले असून घरांच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. या घटनेत रविंद्र सुरेश चव्हाण, दत्ताजी सुरेश चव्हाण,…

Read More

सिंधुदुर्गातील ४३८ पदवीधर शिक्षकांना दिलासा…

जिल्ह्याबाहेर जाण्याची टळली वेळ”:पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास ४३८ पदवीधर शिक्षक अतिरिक्त होऊन जिल्ह्याबाहेर जाण्याची स्थिती निर्माण झालेली असताना सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री श्री.नितेशजी राणे यांनी शालेय शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा करून दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सभेत ‘माझ्या जिल्हयातील कोणीही शिक्षक जिल्हयाबाहेर जाणार नाही’ असे आश्वासित करून सदरच्या पदवीधर…

Read More

अनुसूचित जाती-जमाती उपवर्गीकरणाविरोधात २५ जूनला सिंधुदुर्गनगरीत धरणे आंदोलन…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२४-: अनुसूचित जाती जमाती मधील समाविष्ट असणाऱ्या जातींचे उपवर्गीकरण करण्याच्या महाराष्ट्र सरकारने हालचाली सुरू केल्याने सदर उपवर्गीकरण अन्यायकारक व जाती जातींमध्ये तेढ निर्माण करणारे असल्याने त्याला तीव्र विरोध करण्यासाठी २५ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर भव्य धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती व जमाती मधील समाविष्ट असलेल्या जातींचे उपवर्गीकरण करण्याचा अन्यायकारक…

Read More

माझं गाव आरोग्य संपन्न गाव समितीवर रवी जाधव आणि पत्रकार विनायक गावंस यांची निवड..

⚡​सावंतवाडी ता.२४-:ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि गावागावांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी शासनातर्फे ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, नियोजनासाठी आणि सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी तालुकास्तरीय कृती दल समिती गठीत करण्यात आली आहे. या अधिकृत समितीवर सदस्य म्हणून रवी जाधव आणि विनायक गांवस यांची निवड करण्यात…

Read More

पिंगुळीत ठाकर ग्रामस्थ मंडळा तर्फे साहित्यिक संवाद कार्यक्रम…

⚡कुडाळ ता.२३-: तालुक्यात पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळ पिंगुळी आयोजित साहित्यिक संवाद कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिकांनी साहित्याबाबत मार्गदर्शन करत  तसेच विविध कविता सादर करत रसिकांची मने जिंकली. प्रत्येकाने साहित्य जोपासा. वाचन संस्कृती आत्मसात करा. वाचनामुळेच आपण अधिक बुद्धिवान होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक मोहन रणसिंग यांनी केले.    आपल्या समाजातील काही ज्येष्ठ साहित्यिकांनी विविध साहित्यिक व्यासपीठावर आपल्या प्रतिभेने…

Read More

परुळेची अवंतिका देसाईफेरतपासणीत वेंगुर्ला तालुक्यात दहावीत प्रथम…

.⚡वेंगुर्ला ता.२३-: तालुक्यातीलपरुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिरची विद्यार्थिनी कु. अवंतिका अमेय देसाई हिने इयत्ता १० वीच्या (फेब्रुवारी २०२६) उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनात (फेरतपासणी) उत्तुंग यश मिळवले आहे. फेरतपासणीनंतर तिच्या गुणांमध्ये वाढ झाली असून, ती आता वेंगुर्ला तालुक्यात प्रथम आली आहे.माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अवंतिकाला पुनर्मूल्यांकनापूर्वी ९७.८० टक्के गुण मिळाले होते. मात्र, गुणांवर पूर्ण विश्वास असल्याने तिने फेरतपासणीसाठी…

Read More
You cannot copy content of this page