Headlines

Global Maharashtra Breaking News

सिद्धार्थनगराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार

समीर नलावडे;सिद्धार्थनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व समाजभवनाचे उद्घाटन ⚡कणकवली ता.१२-: कणकवली नगरपंचायतीने सिद्धार्थनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व समाजभवन उभारले आहे. त्याचे उद्घाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा) शाखा सिद्धार्थनगर व बौद्ध विकास मंडळातर्फे आयोजित केला होता. या भवनाचे उद्घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी…

Read More

देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने ‘शिवजयंती उत्सवाचे’ आयोजन…

⚡देवगड ता.१३-: देवगड तालुका मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ‘शिवजयंती उत्सव’ साजरा करण्यात येणार असून यावेळी डॉ. सावंत कंपाउंड कॉलेज नाका येथे भव्य गडकिल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. यामध्ये सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिषेक, सकाळी १०.०० वाजता कॉलेज नाका ते देवगड किल्ला येथे ढोल ताशांचा गजरात…

Read More

मनसेच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

८५ हुन अधिक जणांनी घेतला शिबिराचा लाभ ⚡देवगड ता.१२-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना तोरसोळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना चिटणीस श्री संतोषभाऊ शिंगाडे आयोजित, मनसे शाखा अध्यक्ष श्री राजन पवार आणि सहकारी यांच्या मेहनतीने आज डॉक्टर रघुनाथ गावडे यातर्फे”भव्य आरोग्य शिबीर” तोरसोळे गावात पार पडले. समस्त गावकरी आणि सर्वपक्षीय पदाधिकारी व शालेय मुख्याध्यापक श्री वाडकर सर…

Read More

फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा १४ फेब्रुवारी…

⚡सावंतवाडी ता.१२-: मलंकारा आर्थोडॉक्स चर्च संचलित मार अल्वारीस स्नेह सदन या संस्थेच्या ग्रामीण भागातील फिरत्या वैद्यकीय पथकाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता संस्थेच्या चराठा गावडे शेत येथील कार्यालयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर तर अध्यक्ष म्हणून मेट्रोपॉलिटन डायोसिस ऑफ बॉम्बेचे एच जी…

Read More

रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद…

श्री. स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन; ४०० हून अधिक मुलांनी घेतला सहभाग.. ⚡बांदा ता.१२-: श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

Read More

रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद..

श्री. स्वराज्य प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन; ४०० हून अधिक मुलांनी घेतला सहभाग.. ⚡बांदा ता.१२-: श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तब्बल ४०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उदघाटन सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…

Read More

मतभेद बाजूला करून वैश्य बांधवांनी एकत्र येण्याची गरज

वैश्य समाज मेळाव्यात संदेश पारकर यांचे आवाहन ⚡सावंतवाडी ता.१२-:* समाजात काम करत असताना वैश्य समाजाने नेहमीच पुढाकार घेऊन सामाजिक भान राखले आहे. वृत्ती, कर्तृत्व, दातृत्व म्हणजेच वैश्य समाज. आज समाज संघटित आहे. काही ठिकाणी वैचारिक मतभेदही असतील. परंतु हे मतभेद येणाऱ्या काळात बाजूला सारून समाजासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे प्रतिपादन संदेश पारकर यांनी…

Read More

वैश्यवाणी समाजाच्या न्यायालयीन लढाईला उपमुख्यमंत्र्यांची राज्य शासनाच्या वतीने सहकार्याची ग्वाही

सावंतवाडी येथील मेळाव्यात राजन तेली यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१२-:* आजही वैश्य समाजाला आपण कुठल्या समाजात आहोत हे माहीत नाही वैश्य म्हणजेच वाणी आणि वाणी म्हणजे वैश्य याबाबत आजही खटला सुरू आहे. येणाऱ्या काळात याबाबत हायकोर्टात लढाई लढावी लागेल राज्य शासनाच्या वतीने जे काही सहकार्य पाहिजे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्याची ग्वाही दिलेली आहे.श्री.तेली आज…

Read More

समाजासाठी वेळ देवूनही विमान पकडायचे सांगून निघून जाणे चुकीचे

वैश्य समाज मेळाव्यात राजन तेली यांचा मंत्री केसरकर यांना टोला ⚡सावंतवाडी ता.१२-: समाजाला वेळ दिल्यानंतर तेथे थांबणे गरजेचे आहे, दरवेळी घड्याळाकडे बघून मला विमान पकडायच आहे, असे म्हणून निघून जाण्याचे थांबल पाहीजे. आम्हालाही कामे असतात. कोण रिकामटेकडा नाही, असा टोला राजन तेली यांनी मंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला. तर राज्य सरकारमध्ये स्थान…

Read More

कवयित्री विनया सावंत यांचा कवी कट्ट्याद्वारे गौरव

⚡कणकवली ता.१२-: वर्धा येथे विदर्भ साहित्य संघ-शताब्दी वर्षानिमित्त आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे ९६ वे अखिल भारतीय साहित्यसंमेलन पार पडले. संमेलनात कवी कट्टा व गझल कट्ट्याचे विशेष आयोजन करण्यात आले होते. यावेळी मालवण तालुक्यातील कुड़ोपी येथील कवयित्री विनया प्रदिप सावंत यांना त्यांच्या स्वरचित ‘क्षण नकळत विरघळले’ या कवितेच्या सादरीकरणासाठी कवी कट्ट्याद्वारे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र…

Read More
You cannot copy content of this page