दोडामार्गात विजेच्या समस्येने हैराण झालेल्या नागरिकांच्या संतापाचा कडेलोट… ?
महालक्ष्मीची विज न मिळाल्यास गाठ आमच्याशी ; नगराध्यक्ष चेतन चव्हाणांचा इशारा.. दोडामार्ग : वैभव साळकरसतत तीन दिवस ५० तासांहून अधिक काळ तालुका अंधारात असताना अधिकारी मात्र केवळ खुर्च्या गरम करण्याचे काम करीत असल्याने संतापलेल्या नागरिकांच्या संतापाचा सोमवारी कडेलोट झाला.सतत तीन दिवस काळोखात काढणाऱ्या नागरिकांनी कसई- दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विज कार्यालयात धडक देत…
