Global Maharashtra Breaking News

तुटपुंज्या नुकसानभरपाईचा निषेध; बागायतदारांचा सरकारवर तीव्र आक्रोश…

⚡देवगड ता.२७-:कोकणातील बागायतदारांना नुकसानभरपाईपोटी जाहीर केलेली तुटपुंजी रक्कम शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वर्ग करून घ्यावी. या तुटपुंज्या मदतीचा कोकणातील शेतकऱ्याला कोणताही फायदा होणार नसून त्या मदतीचा आम्ही जाहीर निषेध करतो. विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४२ हजाराची, तर विमा न भरणाऱ्या शेतकऱ्यांना २२ हजाराची तुटपुंजी मदत जाहीर करून शासनाने कोकणातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने फुसण्याचे काम केले…

Read More

नेरूरच्या कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालयाला केएलई च्या उपचार व मदत केंद्रास मंजुरी…

⚡कुडाळ ता.२७-: बेळगाव येथील के एल इ समूहाचे डॉ.प्रभाकर कोरे यांनी नेरुर येथील कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्रामध्ये के. एल.इ. रुग्णालय बेळगाव तर्फे रुग्ण मदत केंद्र, उपचार केंद्र सुरु करण्यासाठी मान्यता दिली आहे.के एल ई रुग्णालय बेळगावचे डॉ.प्रभाकर कोरे यांची बेळगाव येथे बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या…

Read More

नेरूर येथे उद्या मोफत महाआरोग्य शिबिर…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते होणार उद्घाटन… ⚡कुडाळ ता.२७-: कै. यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र,नेरूर येथे बेळगाव येथील के. एल. ई. हॉस्पिटलच्या 142 डॉक्टर- स्टाफ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सर्व रोगावरची तपासणी उपचार यांचा समावेश असलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. याचे उदघाटन उद्या २८ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश…

Read More

ग्रंथालये अपडेट ठेवा…

आम. निलेश राणे:कुडाळमध्ये ग्रंथोत्सव २०२५ चा शुभारंभ;२८ मार्चला होणार ग्रंथोत्सवाची सांगता.. कुडाळ : ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते नक्की सुटले पाहिजेत. पण ग्रंथालयांनी सुद्धा काळासोबत स्वतःला अपडेट केलं पाहिजे. ग्रंथालय आणि वाचनालय अपडेट झाली पाहिजेत. वाचनालये टिकविण्यासाठीचे प्रस्ताव शासनाकडे आले पाहिजेत. फक्त पगार आणि अनुदान या प्रश्नांपेक्षा ग्रंथालये टिकवण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन आमदार…

Read More

बांदा येथे ४५+ जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा थरार…

⚡बांदा ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा हौशी व सावंतवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय ४५+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक २८ व २९ मार्च रोजी बांदा येथील पाटेश्वर मैदानावर पार पडणार आहे.सिंधुदुर्ग जिल्हाहौशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत २०२६ मधील ४५+ गटासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, जिल्ह्यातील अनुभवी क्रिकेटपटूंना आपले कौशल्य…

Read More

कॅनमध्ये पेट्रोल मिळत नसल्याने जलपर्यटन व्यावसायिक अडचणीत…

अन्वय प्रभू यांची जिल्हा प्रशासनावर तीव्र नाराजी.. ⚡मालवण ता.२७-:युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधनाच्या प्रश्नामुळे जिल्ह्यात पेट्रोलपंपवर बाटलीत किंवा कॅन मध्ये पेट्रोल डिझेल देण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केल्यामुळे जलपर्यटन व्यावसायिक अडचणीत आले आहेत. मालवणात जलपर्यटन व्यवसायिकांना जलक्रीडेच्या नौकांमध्ये आवश्यक पेट्रोल भरण्यासाठी कॅन मधून पेट्रोल नेणे गरजेचे असताना त्यांना पेट्रोल पंपवर कॅनमध्ये पेट्रोल देण्यात येत नसल्याने मालवण…

Read More

वत्सला प्रतिष्ठानचे मातोश्री द्रोपदी कुंभार लोकसाहित्य संशोधन व लोककला जतन पुरस्कार जाहीर…

⚡कणकवली ता.२७-: वत्सला प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मातोश्री द्रोपदी कुंभार लोकसाहित्य संशोधन व लोककला जतन पुरस्कार वर्ष 2025-26 साठी जाहीर करण्यात आला आहे. लोकसाहित्य संशोधनासाठी मोहन रणसिंग तर लोककला जतनासाठी शिवदास कुमार मसगे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह प्रा. मोहन कुंभार यांनी दिली. मातोश्री द्रोपदी कुंभार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मागील वर्षापासून वत्सला प्रतिष्ठानच्या…

Read More

इंधन टंचाईने सावंतवाडीकर हैराण, शिवसेना (उबाठा) कडून तहसीलदारांना निवेदन..

गॅस, पेट्रोल-डिझेल अभावी शेतकरी, मच्छीमार व नागरिक अडचणीत; मंत्री- अधिकाऱ्यांच्या ताफ्यावरही निर्बंध लावण्याची केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२७-: नागरिकांना सध्या इंधन टंचाईची झळ बसत असून,यामुळे ग्राहकांना गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल अशा विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे.अशावेळी शासन इंधन टंचाई नसल्याचे सांगत आहे.मात्र सद्य स्थिती ही इंधन मिळत नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे आज…

Read More

इंधन टंचाईने सावंतवाडीकर हैराण, शिवसेना (उबाठा) कडून तहसीलदारांना निवेदन..

गॅस, पेट्रोल-डिझेल अभावी शेतकरी, मच्छीमार व नागरिक अडचणीत; मंत्री- अधिकाऱ्यांच्या ताफ्यावरही निर्बंध लावण्याची केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२७-: नागरिकांना सध्या इंधन टंचाईची झळ बसत असून,यामुळे ग्राहकांना गॅस सिलेंडर,पेट्रोल, डिझेल अशा विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे.अशावेळी शासन इंधन टंचाई नसल्याचे सांगत आहे.मात्र सद्य स्थिती ही इंधन मिळत नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे आज…

Read More

ग्रीन रिफायनरीला विरोध झाला नसता तर पेट्रोल-डिझेल टंचाई नागरिकांना सहन करावे लागले नसते…

बबन साळगावकर यांचे मत; दूरदृष्टीअभावी निर्णय न झाल्याची व्यक्त केली खंत.. ⚡सावंतवाडी ता.२७-:ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला असता, तर आज निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेल टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागले नसते, असे मत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, ग्रीन रिफायनरीसारख्या मोठ्या आणि दूरदृष्टी असलेल्या प्रकल्पाला त्या वेळी योग्य पाठबळ…

Read More
You cannot copy content of this page