चराठा येथील भोसले नाॅलेज सिटी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाला पडले मोठे भगदाड…!
लक्ष वेधूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याची सरपंच प्रचिती कुबल यांची नाराजी.. सावंतवाडी : जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. जीव मुठीत धरून खचलेल्या पुलावरून त्यांना प्रवास करावा लागत आहे. चराठा ग्रामपंचायत, येथील ग्रामस्थांनी लक्ष वेधूनही, एवढंच नव्हे तर जनता दरबारात दाद मागूनही परिस्थिती बदलेली नाही. याउलट पुल अधिक…
