बाबुराव धुरी: जनतेचा उद्रेक निघाल्यास सरकार जबाबदार..
दोडामार्गनिद्रिस्त सरकारच्या सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी उद्धव ठाकरे सेनेच्या माध्यमातून सोमवारी कुडाळ येथील वीज वितरणच्या कार्यालयावर धडक देऊन जाब विचारण्यात येणार आहे अशी माहिती ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज येथे दिली. दरम्यान या समस्या मार्गी न लागल्यास व जनतेचा उद्रेक निघाल्यास याला जबाबदार सरकार राहील असा इशारा देखील यावेळी बाबुराव धुरी यांनी दिला आहे.
