कोणाला दुखापत नाही: रस्त्याच्या मारलेले चर न बुजवल्याने अपघात घडला; अजय सावंत यांचा आरोप..
सावंतवाडी ता.०४-: माजगाव नजदीक आयशर ट्रकला अपघात झाला असून सुदैवाने यात कोणालाही जीवितहानी नाही, मात्र दर्शनी भागाचे ट्रकचं किरकोळ नुकसान झाले आहे.मात्र हा अपघात रस्त्याच्या कडेला केबल साठी मारण्यात आलेल्या चरमुळे घडला असल्याचा आरोप भाजप पदाधिकारी अजय सावंत यांनी केला आहे, त्यामुळे आता तरी बांधकाम विभाग जागे होणार का..? असा सवाल ही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
