जिल्ह्यातील दावे प्रलंबित असलेल्या पक्षकारांनी नोंदणी करावी:जिल्हा विधी सेवा सचिव न्या संपूर्णा कारंडे यांचे आवाहन..
ओरोस ता.२४-: उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले दावे सामोपचाराने सोडविण्याची संधी मुंबई उच्च न्यायालयाने उपलब्ध करून दिली आहे. २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत लोक अदालत आयोजित केली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील दावे प्रलंबित असलेल्या पक्षकारांनी लाभ घ्यावा. यासाठी तालुका आणि जिल्हा विधी सेवा समितीकडे आपला अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा समितीच्या सचिव ऍड संपूर्णा कारंडे यांनी केले आहे.
२०२४ या वर्षातील दुसरी लोक अदालत २७ जुलै रोजी पूर्ण महाराष्ट्रात आयोजित करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोक अदालत या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असलेले दावे सोडविण्यासाठी २९ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. यात पूर्ण महाराष्ट्रातील मुंबई उच्च न्यायालयात दावे प्रलंबित असलेले पक्षकार सहभागी होवू शकतात. याची माहिती देण्यासाठी ऍड संपूर्णा कारंडे यांनी पत्रकार परिषद जिल्हा विधी सेवा इमारतीत आयोजित करण्यात आली होती.
