पुंडलिक दळवी; शहरात कितीही रॅली काढल्या तरी सावंतवाडीतील जनता महाविकास आघाडी सोबतच..
⚡सावंतवाडी ता.०३-: स्वार्थासाठी राजकीय पोळी भाजून घेण्याची वृत्ती ही येणाऱ्या पिढीसाठी घातक आहेत. नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील विळी भोपळ्याची संस्कृती येथील जनता स्वीकारणार नाही, जनता त्यांच्या दिखावू पणाला बसणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचे निश्चितच पडसाद दिसतील अशी टीका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केली.
दरम्यान कालची महायुतीची रॅली म्हणजे एक प्रकारे स्टंटबाजी होती त्यामुळे त्यांच्या रॅलीमध्ये कुठली माणसं होती हे जनतेनेच पहावे कोणी जरी कितीही रॅली काढल्या तरी सावंतवाडी शहरातील जनता ही महाविकास आघाडी सोबतच राहणार असा टोला देखील त्यांनी संजू परब यांना हाणला.
