मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्या मोर्चा….

*पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनीही सहभागी होण्याचे आशिष सुभेदार.यांनी केले आवाहन

*💫सावंतवाडी दि.२५-:* जनतेला भेडसावणार्‍या प्रश्नासंदर्भात माजी आमदार तथा राज्यसरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस येथे उद्या २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील श्रेयवादाच्या लढाईत जनतेचा बळी दिला जात आहे. ही महाराष्ट्राच्या साडेअकरा कोटी जनतेची घोर फसवणूक आहे. कोरोना काळात अनेक व्यवसाय ठप्प होते. दुकाने, आस्थापना बंद होते. अनेकजणांची नोकरी गेली. तरुण बेरोजगार झाले, असे असताना महाविकास आघाडी सरकारने एप्रिलपासून वीज दरात वाढ केली. याची जनतेला कल्पनाही नव्हती. दिवाळीपुर्वी वीजबिलात सवलत देणार, असे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले होते. पण दिवाळीनंतर त्यांनी आपला शब्द फिरवत आलेले वीजबिल भरलेच पाहिजे, अन्यथा वीज जोडणी तोडणार असल्याचे संगितले. अनेक लोकांना दुप्पट, तिप्पट वीजबिले आली आहेत. वीजवितरण कार्यालयात गेल्यानंतर तेथील अधिकारी अगोदर वीजबिल भरण्यास सांगतात. कोरोना परिस्थितिमुळे हतबल जनता सदर वीजबिल भरू शकत नाही व शक्यही नाही. सामान्य जनतेला भेडसावणार्‍या या प्रश्नासंदर्भात येथे उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा फक्त मनसेचा नसून खर्‍या अर्थाने जनतेचा आहे. जिल्हावासीयांचा आवाज सरकार दरबारी पोचावा यासाठी सावंतवाडी तालुक्यातील जनतेने उत्सपूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहनही सावंतवाडी मनसेतर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page