जिल्ह्यातील आरोग्याची अवस्था सुधारली नाही तर येणाऱ्या काळात मनसे आंदोलन करणार…

*अँड.अनिल केसरकर; मनसेत गटबाजी नसून सर्वजण एकत्रच आहोत…

⚡सावंतवाडी ता.०१-: जिल्ह्याला तीन-तीन मंत्री लाभले असताना देखील आरोग्याची अवस्था जर सुधरत नसेल तर येणाऱ्या काळात मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अँड.अनिल केसरकर यांनी आज येथे दिला.दरम्यान मनसेत कोणतीही गटबाजी नसून सर्वजण आम्ही एकत्रच आहोत असे देखील श्री केसरकर यांनी यावेळी सांगितले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावी श्री केसरकर पुढे येणाऱ्या काळात होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे जो उमेदवार देतील त्याला आम्ही निवडून आणण्याचा मी काम करेल त्यासाठी जास्तीत जास्त नाव नोंदणीचे करणार असल्याचे देखील श्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.

अँड. अनिल केसरकर (जिल्हाध्यक्ष),सुधीर राऊळ (उपजिल्हध्यक्ष), श्री. अँड. राजु कासकर (परिवहन जिल्हाध्यक्ष),मिलिंद सावंत (तालुकाध्यक्ष)मा. श्री. गुरुदास गवंडे (विधानसभा सचिव).अतुल केसरकर विष्णू वसकर पांडुरंग बुगडे,जय राऊळ,काशिराम गावडे
नरेश देऊलकर (ग्रा.पं. सदस्य, आरोंदा),चिन्मय नाडकर्णी:
श्रीराम सावंत,जय सावंत,केतन सावंत
सत्यवान सावंत,श्रीराम सावंत,अंकुश सावंत आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page