*💫सावंतवाडी दि.१२-:* सावंतवाडी शहरात काही भागात कमी प्रमाणात होत असलेल्या पाणी प्रश्नांवरून आज सत्तधरी व विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. शिवसेनेची सत्ता असताना त्यांनी यावर का आवाज उडवला नाही. असा प्रश्न नगरसेवक नासिर शेख यांनी उपस्थित केला आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांनी येत्या दोन वर्षात शहरातील पाणी प्रश्न मिटून शहरात २४ तास पाणी पुरवठा मिळेल असे आश्वासन दिले आहे. यासाठी टीएस मधून ४६ कोटी मंजूर झाले आहेत. अशी माहिती त्यांनी दिली आहे.
*शहरातील पाणी प्रश्नावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडांजगी*
