ठाकरे शिवसेनेच्या जयेंद्र परुळेकर यांचा आरोप:४९ मायानिंग प्रकल्प वाचविण्यासाठी दबावातून केले काम
⚡सावंतवाडी ता.०४-: सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी सावंतवाडी दोडामार्ग मधील वाईल्ड लाईफ कॉरिडोर संदर्भात उच्च न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केला आहे असल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते जयेंद्र परूळेकर यांनी आज येथे केला.
दरम्यान सावंतवाडी दोडामार्ग मधील प्रस्तावित 49 मायनिंग प्रकल्प सुरू व्हावेत. यासाठी दबावापोटी उपवनसंरक्षकांनी हे खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. ते आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
