राष्ट्रीय सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना आवाहन

⚡मालवण ता.२८-: मालवण तालुक्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यासाठी पंतप्रधानांनी ७५ व्या स्वातंत्र्य दिनी देशातील गरीब जनतेस पौष्टिक धान्य उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. याबाबत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय अन्न योजनेच्या सर्व लाभार्थ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांनी केले आहे.

त्याअनुषंगाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यातील राबविण्यात येणारे लक्ष्य निर्धारित वितरण व्यवस्थेमार्फत पोषणात्मक गुणसंवर्धित तांदूळ (Fortified RicT) वितरित करण्याबाबतच्या योजनेस केंद्रीय आर्थिक व्यवस्थापन समितीने ७ एप्रिल २०२२ रोजीच्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार केंद्र शासनाने मार्च २०२४ पर्यंत राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना फोर्टिफाईड तांदूळ वितरित करण्यास मंजुरी दिलेली आहे. आता ज्यात जीवनसत्व बी-१२, फॉलिक अॅसिड व लोह या सूक्ष्म पोषक तत्वांचा समावेश असतो. असा 1 FRK 100 CMR दाणे या प्रमाणात मिश्रीत करून तयार होणारा फोर्टिफाईड राईस एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत वितरित करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page