धोकादायक प्राण्यांना वस्तीपासून दूर न्यावे:शेतकरी प्रकाश गावडे यांची मागणी…
⚡बांदा ता.१०-: रोणापाल पूर्णिचा ओहोळ येथे शेतकरी प्रकाश गावडे यांनी सकाळी म्हशींना चरावयास नेले. पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशींवर ओहोळात दबा धरून बसलेल्या मगरीने हल्ला केला. यामध्ये मुरा जातीच्या गाभण म्हैशीचा जबडा फडल्याने म्हैस जखमी झाली तर अन्य जनावरांनी आपला जीव वाचवला. जखमी म्हैशीवर उपचार करण्यात आले. मात्र ‘म्हशी पाण्यात देऊ नका’ असे उत्तर वनविभाग अधिकाऱ्यांनी दिल्याने शेतकरी आश्चर्यचकित झाले. पाण्याशिवाय म्हशी कशा राहू शकतील असा सवाल उपस्थित शेतकऱ्यांनी करत वनाधिकाऱ्यांना धारेवर धरले.
वन अधिकाऱ्यांनी म्हैशीना पाण्यात नेऊ नका असे सांगितल्यावर शेतकरी मंगेश गावडे, सुरेश गावडे, अशोक कुबल, बाबल तुयेकर यांनी अधिकाऱ्यांनाचा धारेवर धरले.
वनविभागाने केवळ पंचनामा करण्यात धन्यता न मानता अशा धोकादायक प्राण्यांना वस्तीपासून दूर न्यावे किंवा त्यांच्यावर उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी प्रकाश गावडे यांनी केली आहे.