रत्नागिरी येथे हवेत गोळीबार करून पळालेल्या तिघांना आंबोलीत पकडले.

⚡आंबोली ता.०६-: राजापूर येथे हवेत गोळीबार करून पळालेल्या तिघांना स्विफ्ट गाडीसह नाकाबंदी करून आंबोलीत पोलिसांनी पकडले व रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात दिले ही कारवाई पहाटे साडे चार वाजता आंबोली पोलीस दुरक्षेत्र येथे पोलीस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनखाली आंबोली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर हवालदार दीपक शिंदे पोलीस नाईक मनीष शिंदे,महेंद्र मातोंडकर,होमगार्ड चंद्रकांत जंगले यांनी नाकाबंदी करून पकडण्यात आले आणि रत्नागिरी पोलिसांकडे सुपूर्त केले.

याबाबत अधिक माहिती अशी, नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग यांच्याकडून माहिती पोलिसांना देण्यात आली स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच 14 जे ए 4115 तसेच फॉच्युनर 9090 या दोन गाडीतील इसमानी कोंडे तर्फे सौन्दळे,ता.राजापूर येथे तिघांनी हवेत गोळीबार करून सिंधुदुर्ग च्या दिशेने पळून गेले यानंतर नियंत्रण कक्षकडून माहिती प्राप्त होताच आंबोलीत नाकाबंदी करण्यात आली. साडे चार वाजता पहाटे संबंधित गाडी येथील चेक नाक्यावर पकडण्यात आली.यात चालक प्रवीण परमेश्वर ,वय 25,रा.तंबाळे, ता.मोहोळ,जिल्हा सोलापूर,शेखर नेताजी भोसले,वय 25,रा.खवणे,तालुका मोहोळ,प्रेमकुमार जेठाराम चौधरी,वय 23,रा.गुडमलानी, बाडनेर,राजस्थान, याना थांबवुन अंगझडती घेण्यात आली.त्यांच्या ताब्यात सिद्धिविनायक रोडवेज च्या नावे टपालबुक आढळून आले आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही.नियंत्रण कक्षाच्या माहितीवरून संबंधितांना पकडण्यात आले व रत्नागिरी पोलिसांच्या पुढील कारवाई साठी ताब्यात देण्यात आले.

You cannot copy content of this page