मंत्री नारायण राणे; वाढदिनी कार्यक्रमात कार्यकर्त्यांना केले संबोधित..
⚡सावंतवाडी ता.१०-: जिल्ह्यातील जनतेच्या सुख समाधानातच माझे यश आहे, गेली अनेक वर्ष जिल्हावासियांचे प्रेम मी जवळून पाहिले आहे, त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील एकही व्यक्ती गरीब राहता कामा नये. याकरिता जिल्ह्यात आर्थिक सुबत्ता आणण्याचा माझा प्रयत्न राहील, असे मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या वाढदिनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
दरम्यान आज सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने झाराप येथे स्नेहबंध कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्री राणें यांनी संबोधित केले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राणे यांनी शुभेच्छा स्विकारल्या.
