अशोक गावडे यांच्या ऊस आणि मका पिकाचे केले नुकसान;पाच एकर क्षेत्र केले जमीनदोस्त
आंबोली, ता.७: येथील नांगरतासवाडी येथील अशोक सखाराम गावडे यांच्या ४ एकर उसशेतीचे आणि १ एकर मक्याचे नुकसान गवारेड्यानी केले.या भागात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांकडून नुकसान केले जात आहे मात्र वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नाही.केवळ तात्पुरते एखाद्या वेळी येऊन पंचनामा केला जातो मात्र कागदपत्र पूर्तता आणि नुकसान भरपाई दिली जात नाही भीक नको पण कुत्रे आवर या उक्तीप्रमाणे गव्याना आवर असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.येथील चंद्रकांत पाताडे यांच्या देखील उसशेतीचे मोठे नुकसान केले.आंबोलीत मोठ्या प्रमाणात गव्याची आणि माकडांची आणि वन्य प्राण्यांची संख्या वाढली आहे.मात्र वनखात्याकडून कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.याबाबत शेतकऱ्यांनी वनखात्यावर संताप व्यक्त केला असून तात्काळ उपाययोजना न केल्यास मोर्चा नेण्याचा इशारा दिला आहे.
