किती सरपंच निवडून आले याचे आत्मपरीक्षण मंत्री केसरकर यांनी करावे

ठाकरे गट तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा पलटवार

सावंतवाडी ता.२६-: सावंतवाडी तालुक्यातील शिंदे गटाचे किती सरंपच निवडून आले व किती पॅनल उभे केले. याचे आदी मंत्री केसरकर यांनी आत्मपरीक्षण करावे. आता त्यांना आपल्या आमदारकीचा प्रभाव दिसू लागल्याने ते केविलवाणा प्रयत्न करत आल्याचा पलटवार रूपेश राऊळ यांनी आज येथे केले. काल केसरकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली होती. याला आज श्री .राऊळ यांनी यांनी प्रत्युत्तर दिल.

यावेळी बोलताना पुढे राऊळ म्हणाले की सावंतवाडीच्या धर्तीवर मुंबईचा विकास करणे म्हणजे हास्यास्पद आहे असा टोलाही यावेळी राऊळ यांनी लगावला दरम्यान जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा ते खासदार अशी असा विश्वास आहे राहुल यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी चंद्रकांत कासार वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळू परब आबा सावंत माजगाव विभाग प्रमुख सुनील गावडे, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page