शिवसेनेचे लोकप्रतिनिधी अकार्यक्षम

संतोष नानचे, अक्रम खान यांचा हल्लाबोल

*💫सावंतवाडी दि०२-:* बांदा- दोडामार्ग रस्त्याची दुर्दशा व्हायला सत्ताधारी जबाबदार असून गेली दोन वर्षे आम्ही लढा देत आहोत. मात्र, याची दखल न‌ घेणार ठाकरे सरकार, आमदार, खासदार, पालकमंत्री अकार्यक्षम आहेत, असा हल्लाबोळ बांदा सरपंच अक्रम खान, दोडामार्ग माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी केला. त्यामुळेच १ मार्चला ‘तिरडी यात्रा’ काढणार असल्याचा रोखठोक इशाराही अक्रम खान व संतोष नानचे यांनी दिला आहे. तर गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर अस मतही त्यांनी यावेळी व्यक्त केल. यावेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब, मकरंद तोरसकर, बंटी राजपुरोहित आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page