माजी सरपंच चंद्रशेखर सुतार यांचा प्रामाणिकपणा

⚡मालवण ता.२९-: त्रिंबकचे माजी सरपंच चंद्रशेखर सुतार यांनी आचरा- कणकवली मार्गावर त्रिंबक येथे सापडलेले पैशाचे पाकीट मूळ मालकास परत करत प्रामाणिकपणाचे उदाहरण समाजापुढे ठेवले आहे. श्रावणचे तलाठी नामदेव देसाई हे मालवण-आडवली असा प्रवास करत असताना त्यांचे पैशाचे पॉकीट हरवले. हे पाकीट सुतार यांना विस्कटलेल्या अवस्थेत आचरा-कणकवली मार्गावरील त्रिंबक साटमवाडी येथे मिळाले. सुतार यांनी पाकीट देसाई यांचे असल्याची खात्री पटल्याने आचरा मंडल ऑफीस येथे जाऊन ‘पाकीट परत केले.

पाकीटात ९ हजार ६०० रुपये रोख ‘व महत्वाची कागदपत्रे होती. यावेळी मंडल अधिकारी अनिल परब, आचरा तलाठी काळे, चिंदर भटवाडी तलाठी योगेश माळी, बाबू कदम उपस्थित होते.

You cannot copy content of this page