आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्याला यश
कणकवली ता.१६-:* मालवण तालुक्यातील किर्लोस येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात संकल्पित पाणीसाठा करण्यासाठी बंधारा दुरुस्ती करुन लोखंडी गेट ऐवजी एफ. आर. पी गेट बसविण्यासाठी २ कोटी ७० लाख रु निधी मंजूर करण्यात आला असून निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे सदर निधी मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कोल्हापूर पद्धतीच्या किर्लोस येथील बंधाऱ्यात संकल्पीत पाणीसाठा ५२६.३० सघमी व मुळ सिंचन क्षमता १७९ हे. आहे. या बंधा-याला बसविण्यात आलेल्या लोखंडी निडल्स या बहुतांश गंजणे, चोरीस जाणे, बेंड होणे, वाहुन जाणे यामुळे पुर्णतः नादुरुस्त झालेल्या आहेत. तसेच साईड चॅनल गंजून खराब झाले आहेत. त्यामुळे या बंधा-यामध्ये संकल्पित पाणीसाठा होत नाही. तसेच बंधा-याचा स्लॅब खालील बाजुने झीज झालेला आहे.या बंधाऱ्याच्या साईड चॅनल व गेटची दुरुस्ती करणे, स्लॅबचे मजबुतीकरण करणे लोखंडी गेटऐवजी एफ.आर. पी गेट बसवून संकल्पित पाणीसाठा करण्याची मागणी होत होती. या कामाला निधी मंजूर करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्यानुसार बंधारा दुरुस्ती करुन लोखंडी गेट ऐवजी एफ. आर. पी गेट बसविण्यासाठी २ कोटी ७० लाख रु निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
