*⚡मालवण ता.२४-:* वायरी भुतनाथ ग्रामपंचायत मध्ये बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
यावेळी उपसरपंच नाना नाईक, तलाठी व्ही. एम. राठोड, प्रदिप वेंगुर्लेकर, प्रियांका रेवंडकर, मंजिरी लोकेगावकर, प्रगती लुडबे, महादेव मालवणकर हे उपस्थित होते.
