*💫मालवण दि.१९-:* रविवार पासून पुन्हा जोर धरलेल्या पावसाने चिंदर लब्देवाडी, तेरई,भगवंत गड परिसराला चांगलाच फटका बसला आहे.भातशेतीचेही पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पुरस्थीतीची पहाणी चिंदर सरपंच राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे यांनी सोमवारी सकाळी केली.व ग्रामस्थांना धीर दिला. यावेळी त्यांच्या सोबत पोलीस पाटील दिनेश पाताडे, ग्रामपंचायत कर्मचारी रणजीत दत्तदास आदी उपस्थित होते.
चिंदर येथील पुरस्थीतीची सरपंच उपसरपंच यांच्या कडून पहाणी
