⚡कुडाळ ता.२७-: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कुडाळ तालुक्यात चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदच्या 9 गटांसाठी 21 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने जि प साठी 22 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. पंचायत समितीच्या 18 गणांसाठी 19 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने प स साठी आता 45 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. बहुतेक ठिकाणी महायुती विरुद्ध ठाकरे सेना अशी लढत होत असून काही ठिकाणी अपक्षांमुळे तिरंगी लढत होत आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 5 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट झाले. जिल्हा परिषदेच्या 9 गटांसाठी 6 ठिकाणी दुरंगी, दोन ठिकाणी तिरंगी तर पावशी मध्ये चौरंगी लढत होत आहे.
पंचायत समितीच्या 18 गणांसाठी 10 ठिकाणी दुरंगी, 7 ठिकाणी तिरंगी आणि एका ठिकाणी चौरंगी लढत होत आहे.
जिल्हा परिषदच्या 9 गटांसाठी 22 उमेदवार रिंगणात
आंब्रड या गटातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शेजल शेखर परब व तर शिवसेनेच्या दिपलक्ष्मी पडते यांच्यात थेट लढत होणार आहे.
वेताळ बांबर्डे या गटातून शिवसेनेचे नागेश नारायण आईर व शिवसेना (उबाठा) पक्षाचे बाजीराव बाबाराम झेंडे यांच्यात लढत होणार आहे.
ओरोस बु. या गटातून भाजपच्या सुप्रिया संतोष वालावलकर आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या जान्हवी जगन्नाथ सावंत यांच्यात थेट लढत होणार आहे.
पावशी या गटातून भानुदास सुखदेव रावराणे, यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. शिदे शिवसेनेतर्फे तुकाराम उर्फ दादा चंद्रकांत साईल, तर शिवसेना (उबाठा) पक्षाकडून अमरसेन पुष्पसेन सावंत यांनी उमेदवारी दाखल केला आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून भिकाजी सोमा जाधव यांनी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी चौरंगी लढत होत आहे.
नेरूर देऊळवाडा या गटातून संजय धोंडदेव पडते (शिवसेना), रुपेश अशोक पावसकर (अपक्ष) यांच्यात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष असेल.
तेंडोली या गटात आरती हरीशचंद्र पाटील (भाजप.), सुजाता सचिन गावडे (शिवसेना – उबाठा) यांच्यात थेट लढत होणार आहे.
पिंगुळी या गटातून गगाराम गणेश सडवेलकर (शिवसेना – उबाठा), अजय सत्यवान आकेरकर (भाजप.) गजानन राजेंद्र राऊळ (मनसे), यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
घावनळे या गटातून सखाराम चंद्रकांत खोचरे (शिवसेना – उबाठा), व केशव उर्फ दिपक रमेश नारकर (शिदे शिवसेना) यांच्यात थेट लढत होणार आहे.
माणगाव गटातून रुपेश रावंद्र कानडे (शिदे शिवसेना), प्रसाद मदन नार्वेकर (अपक्ष) व रमाकांत वसंत ताम्हणेकर (शिवसेना – उबाठा) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
पंचायत समितीच्या 18 गणांसाठी 45 उमेदवार रिंगणात
आंब्रड मध्ये दशरथ बाळाराम मेस्त्री (उबाठा), नितीन मधुकर म्हाडेश्वर (भाजपा) यांच्यात थेट लढत होणार आहे.
जांभवडे मध्ये धोंडी वसंत मडवळ ( अपक्ष),बाळकृष्ण विष्णू मडव (शिवसेना), सुभाष गोपाळ मडव (अपक्ष), यशपाल अशोक सावंत (शिवसेना (उबाठा) यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.
आवळेगाव मधते योगिता नंदकिशोर पवार (शिवसेना (उबाठा) आणि श्रावणी धनश्याम तेरसे (भाजपा) यांच्यात थेट लढत होणार आहे.
वेताळबांबर्डे मध्ये आश्विनी उदय सावंत (शिवसेना), सौ.स्मिता अरविंद बांबार्डेकर (अपक्ष), समृध्दि सतोष कदम (शिवसेना उबाठा) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
ओरोस बुद्रुक मध्ये अमित मनोहर भोगले (भाजपा), महादेव लक्ष्मण परब (शिवसेना उबाठा), योगेश राजाराम तावडे ( अपक्ष) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
कसाल मध्ये बापू गणपत पाताडे (शिवसेना), संतोष शंकर कादळकर (शिवसेना उबाठा) यांच्यात थेट लढत होणार आहे.
डिगस मध्ये निखिल नित्यानंद कांदळगावकर (शिदे शिवसेना), नारायण सुरेद्र मांजरेकर (शिवसेना उबाठा) यांच्यात थेट लढत होणार आहे.
पावशी मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चित्रा विजय पावसकर, भाजपच्या करुणा चंद्रकांत पावसकर यांच्यात थेट लढत होणार आहे.
नेरूर देऊळवाडा उत्तर भाग मध्ये शिवसेनेच्या निता भास्कर नाईक आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या दिप्ती प्रदीप नाईक यांच्यात थेट लढत होणार आहे.
नेरूर देऊळवाडा दक्षिण भाग मधून शिवसेना (उबाठा) पक्षाच्या अर्चना आत्माराम बंगे, भाजपच्या ममता लक्ष्मण देसाई यांच्यात थेट लढत होणार आहे.
पाट येथून शिवसेनेच्या प्रियंका समीर जळवी आणि शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्राची प्रमोद कुंभार यांच्यात थेट लढत होणार आहे.
तेंडोली मतदारसंघातून अपक्ष म्हणून निखिल राजाराम ओरोसकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विजय सुरेश प्रभू व भाजपचे मगेश श्रीकृष्ण प्रभू यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
पिंगुळी मतदारसंघातून भाजपच्या साधना सतिश माडये, शिवसेना (उबाठा) पक्षाच्या ममता दत्तगुरु राऊळ आणि अपक्ष कश्मिरा केतन शिरोडकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
साळगाव येथून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रतीक संतोष सावंत, शिवसेनेचे मिलिंद वसंत नाईक आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे कृष्णा दत्ताराम धुरी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
घावनळे मतदारसंघातून शिवसेना (उबाठा) पक्षाच्या सोनिया संतोष मुंज, भाजपच्या अर्चना अनिल घावनळकर यांच्यात थेट लढत होणार आहे.
गोठोस मतदारसंघातून शिवसेनेच्या दिव्यानी धाकू खरात तर शिवसेना उभाठा कडुन दीक्षा दिगंबर तवटे यांच्यात थेट लढत होणार आहे.
माणगाव मतदारसंघातून शिवसेनेचे कौशल दत्ताराम जोशी, उबाठाचे योगेश दत्तराम धुरी, अपक्ष रत्नाकर बबन जोशी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
झाराप मतदारसंघातून भाजपकडून सिताराम श्रीधर तेली, शिवसेना उबाठा कडुन यज्ञेश तातू गोडे आणि अपक्ष अच्युत उर्फ अनिकेत राजेंद्र तेंडोलकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
यावेळी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.
